मुंबई : नागपूरमध्ये होणारा सौर पॅनेल प्रकल्प गुजरातला गेल्याच्या आरोपांमध्ये तथ्य नसून आम्ही महाराष्ट्रातच गुंतवणूक करणार असल्याचे रिन्यू कंपनीने स्पष्ट केले आहे. हा प्रकल्प गुजरातला गेल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता. महाराष्ट्र सरकारशी चर्चा अपूर्ण राहिल्याने किंवा वीज दर प्रचंड असल्याने महाराष्ट्रात गुंतवणूक करणार नाही, असे आम्ही म्हटल्याचा आरोप खोटा, दिशाभूल करणारा व बेजबाबदारपणाचा आहे, असे कंपनीने नमूद केले आहे.

हेही वाचा : काश्मीर बदल रहा है! शून्य मतदान होणाऱ्या गावात यंदा प्रचंड मतदान

BJP worried about defection before Legislative Assembly seat allocation in Maharashtra
महाराष्ट्रात जागावाटपापूर्वी भाजपला पक्षांतराची चिंता? २३ जागांवर राष्ट्रवादी अजित पवार गटाविरुद्ध भाजपमध्ये नाराजी का?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Sarbanand Sonowal asserts that the port is an attraction for the world
वाढवण बंदर जगासाठी आकर्षणबिंदू -सोनोवाल
St Services shut in maharashtra
ST Strike : महाराष्ट्रात लाल परीची चाके थांबली, एसटी कर्मचारी संपावर गेल्याने वाहतूक विस्कळीत; मुंबई, ठाणे, पुण्यात काय स्थिती?
regional discrimination, textile industry policy,
सांगली : वस्त्रोद्योग धोरणात प्रादेशिक भेदभावाचा आरोप, पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय – किरण तारळेकर
Antar Singh Aryas appeal to youth says responsibility of youth to save tribals
आदिवासींना वाचविण्याची युवापिढीवर जबाबदारी, युवा संवादमध्ये अंतरसिंग आर्या यांचे आवाहन
Maharashtra Crime News
Crime News : महाराष्ट्रात चाललंय तरी काय? बदलापूर, मुंबई अकोल्यासह मुलींवर अत्याचाराच्या मन सून्न करणाऱ्या घटना
Badlapur Crime News
Badlapur Sexual Assault : “बदलापूर प्रकरणी एका महिला पोलिसाने शाळा प्रशासनाबरोबर..”, पीडितेच्या पालकांचा गंभीर आरोप

रिन्यू ही महाराष्ट्रातील सर्वांत मोठी सौर ऊर्जा क्षेत्रातील कंपनी आहे आणि राज्यासाठी आमची वचनबद्धता आहे. महाराष्ट्रात कंपनीचे ५५० मेगावॉट स्थापित क्षमतेचे प्रकल्प सुरू असून आणखी दोन हजार मेगावॉट क्षमतेच्या प्रकल्पांचे काम सुरू आहे. या प्रकल्पांमध्ये सुमारे १५ हजार कोटी रुपये गुंतवणूक करण्यात येत असून ते २०२६ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. पंप स्टोरेज, ग्रीन डायड्रोजन क्षेत्रातही रिन्यू कंपनी राज्यात काम करणार असून यातून ३० हजार रोजगारनिर्मिती होणार आहे. कंपनी महावितरणला ५५० मेगावॉट वीज स्पर्धात्मक दरात देत असून, पूर्ण झालेल्या आणि काम सुरू असलेल्या प्रकल्पांमध्ये सुमारे एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात करीत असल्याचे रिन्यू कंपनीने म्हटले आहे.