नागपूर : विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेस पक्षासमोर नव्याने संघटन बांधणीचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाल्याने आता राज्यातील पक्ष वाढीची जबाबदारी पुन्हा विदर्भातील नेत्यांकडेच येण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे केवळ १६ आमदार निवडून आले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, नसीम खान, यशोमती ठाकूर यांच्यासह काँग्रेसच्या अनेक प्रमुख नेत्यांचा पराभव झाला. काँग्रेसला ज्या १६ जागांवर विजय मिळाला, त्यापैकी नऊ जागा विदर्भातील आहेत. यामध्ये अकोला पश्चिममधून साजिद खान पठाण, रिसोड अमित झनक, उमरेड संजय मेश्राम, पश्चिम नागपूर विकास ठाकरे, नागपूर उत्तर नितीन राऊत, साकोली नाना पटोले, आरमोरी रामदास मसराम, ब्रह्मपुरी विजय वडेट्टीवार, यवतमाळ अनिल ऊर्फ बाळासाहेब शंकरराव मंगुळकर यांचा समावेश आहे. काँग्रेसचे विदर्भातील अमरावती, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या पाच ठिकाणी खासदार आहेत.

राजधानी दिल्लीत कुणाची सत्ता येणार? आकडेवारीने वाढवलं केजरीवालांचं टेन्शन (फोटो सौजन्य पीटीआय)
Political News : राजधानी दिल्लीत कुणाची सत्ता येणार? आकडेवारीने वाढवलं केजरीवालांचं टेन्शन
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
congress government analysis Telangana caste Survey
अन्वयार्थ : जनगणना कधी?
delhi assembly elections 2025
लालकिल्ला : दिल्ली भाजपसाठी आणखी प्रतिष्ठेची!
Navi Mumbai, Re-survey, constructions ,
नवी मुंबई : प्रकल्पग्रस्तांच्या बांधकामांचे पुन्हा सर्वेक्षण, सिडको मंडळाकडून सर्वेक्षणासाठी ५५ कोटी रुपये खर्च
rahul gandhi mallikarjun kharge (1)
देणग्यांच्या बाबतीतही काँग्रेस पिछाडीवर; वर्षभरात जमा झाला १,१२९ कोटींचा निधी
waqf board amendment bill 2024
Waqf Board Bill: वक्फ बोर्ड विधेयकासंदर्भातल्या बैठकीत सत्ताधाऱ्यांच्या १२ सुधारणा मंजूर, विरोधकांच्या सर्व सुधारणा फेटाळल्या!
BJP leader manoj tiwari interview
ते ‘रेवड्या’ वाटतात, आम्ही ‘मोफत’ देतो; भाजपा नेते मनोज तिवारींची ‘आप’वर टीका

हेही वाचा >>>बावनकुळे, शेलार यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी कायम; मंत्रिमंडळातील नावांबाबत चर्चा सुरू

राज्यात काँग्रेसच्या खासदार आणि आमदारांची संख्या विदर्भात अधिक आहे. तसेच विधान परिषदेचे आमदार देखील विदर्भातून गेले आहेत. त्यामुळे पक्ष वाढीसाठी आवश्यक रसद येथूनच मिळू शकते.त्यामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठी पटोले आणि वडेट्टीवार यांच्यावरच पक्षवाढीची जबाबदारी सोपवण्याची शक्यता आहे.

आम्हाला विधानसभा निवडणुकीचा निकाल मान्य नाही. हा जनतेचा कौल नाही, ‘ईव्हीएम’ची कमाल आहे. निवडणूक मतपत्रिकेवर झाली पाहिजे यासाठी आम्ही आंदोलन उभे करणार आहोत. सोबतच पक्ष वाढीसाठी राज्यातील सर्व ज्येष्ठ नेते मिळून प्रयत्न करू.-अतुल लोंढेमुख्य प्रवक्ते, प्रदेश काँग्रेस.

Story img Loader