लोकसभा निवडणुकीनंतर आंध्र प्रदेश हे राज्य आता सर्वार्थाने महत्त्वाचे ठरले आहे. भाजपाला संपूर्ण बहुमत न मिळाल्याने एनडीएतील घटकपक्षांच्या जोरावर भाजपा केंद्रातील सत्तेत आहे. त्यातीलच एक महत्त्वाचा घटक पक्ष म्हणजे एन. चंद्राबाबू नायडू यांचा आंध्र प्रदेशमधील तेलुगु देसम पक्ष होय. आंध्र प्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभेच्याही निवडणुका पार पडल्या असून त्यामध्ये सत्ताधारी वायएसआरसीपी पक्षाचा धुव्वा उडवण्यात एनडीए आघाडीला यश आले आहे. टीडीपी आणि भाजपाबरोबरचा एक प्रमुख पक्ष म्हणजे जन सेना पार्टी होय. या पक्षाचा उदय आणि कामगिरी कमालीची ठरली आहे. ५५ वर्षीय अभिनेता पवन कल्याण याच्या या पक्षाने निवडणुकांमध्ये १०० टक्के स्ट्राईक रेट दिला आहे. विधानसभेच्या निवडणुकीत लढवलेल्या सर्व २१ जागांवर आणि लोकसभेच्या लढवलेल्या दोन जागांवर या पक्षाने विजय मिळवला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा