लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामधील संबंध दुरावल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपाचे कान टोचल्यानंतर संघाशी संबंधित मासिकांनीही भाजपाच्या सुमार कामगिरीचे विश्लेषण करताना पक्षावर बरीच बोचरी टीका केली आहे. संघाचे मुखपत्र मानल्या जाणाऱ्या ‘ऑर्गनायझर’मध्ये याआधीही भाजपाच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यात आले होते. त्यानंतर आता ‘विवेक’ या संघाशी संबंधित साप्ताहिकानेही भाजपाच्या महाराष्ट्रातील सुमार कामगिरीचे विश्लेषण करताना अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच्या युतीवर खापर फोडले आहे. त्याबरोबरच पक्ष, कार्यकर्ते आणि राज्यातील महायुती सरकारमध्ये सुसंवाद नसल्यामुळे हा निकाल पहायला मिळाला असल्याची टीकाही विवेक साप्ताहिकाने केली आहे. ‘कार्यकर्ता खचलेला नाही, तर संभ्रमात!’ असे या लेखाचे नाव आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, “लोकसभेतील अपयशाची कारणे सांगताना वा आपापली नाराजी, अस्वस्थता सांगताना जवळपास प्रत्येक कार्यकर्ता आज पहिली सुरुवात करतो ती राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेल्या युतीपासून. राष्ट्रवादीला सोबत घेणे भाजपाच्या कार्यकर्त्याला आवडलेले नाही हे स्पष्ट आहे. याची जाणीव भाजपा नेत्यांना नाही असे नाही.”

हेही वाचा : ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन’ योजनेत मुस्लीमधर्मीय स्थळांचा समावेश करा; सप आमदाराची मागणी

Sharad Pawar
Sharad Pawar: ‘त्या लोकांचे स्वागत करण्यासाठी आम्ही तयारच आहोत’, राष्ट्रवादीत प्रवेश घेणाऱ्यांबाबत शरद पवारांचे सूचक विधान
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
RSS, BJP, Mohan Bhagwat
भाजपला धोरणबदलाचा अप्रत्यक्ष सल्ला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका
Devendra Fadnavis Eknath Shinde Ajit Pawar X
Mahyuti Disruption : तानाजी सावंतांपाठोपाठ भाजपा नेत्याची राष्ट्रवादीवर टीका; म्हणाले, “त्यांच्यामुळे आमचं वाटोळं…”, महायुतीत धुसफूस चालूच
Bhagyashree Dharmarao Atram is an election candidate from Sharad Pawar group against Dharmarao Baba
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांविरोधात त्यांच्या कन्येला उमेदवारी, अनिल देशमुखांनी स्पष्टच सांगितले…
Mumbai mallikarjun kharge marathi news
“मोदीशहांच्या हाती महाराष्ट्र देऊ नका!”, मल्लिकार्जुन खरगे यांचे आवाहन
Devendra Fadnavis And Ajit Pawar News
NCP : अजित पवारांच्या ताफ्याला भाजपा कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे, “देवेंद्र फडणवीस उत्तर द्या”, कुणाची मागणी?
The MP of the Nationalist Sharad Pawar group Dr Amol Kolhe was also asked to answer by the Maratha protesters
डॉ. अमोल कोल्हे यांनाही मराठा आंदोलकांकडून विचारणा

महाराष्ट्रामध्ये भाजपाने अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेबरोबर लोकसभेची निवडणूक लढवली. महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने लढवलेल्या एकूण १५ जागांपैकी फक्त ७ जागांवर विजय मिळवला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये तेव्हाच्या शिवसेनेने (एकसंध) २३ जागा जिंकल्या होत्या. अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने लढवलेल्या ४ जागांपैकी फक्त एका जागेवर विजय मिळवता आलेला आहे. शिवसेना हा हिंदुत्ववादी पक्ष असल्याने भाजपाने शिवसेनेबरोबर युती करणे नैसर्गिक आहे, असेही मत ‘विवेक’मधील लेखामध्ये मांडण्यात आले आहे. “शिवसेनेने पुन्हा युतीत येणे, त्यासाठी शिवसेनेत घडलेले अंतर्गत बंड, एकनाथ शिंदे यांचा शपथविधी आदी घटना कार्यकर्त्यांनी स्वीकारल्या. हिंदुत्व हा सामायिक दुवा असल्याने आणि या युतीला मागील अनेक दशकांचा इतिहास असल्याने बारीकसारीक कुरबुरी असल्या तरी ही युती नैसर्गिक असल्याचे मतदारांना पटले होते. मात्र हीच भावना राष्ट्रवादी सोबत आल्यानंतर अगदी दुसर्‍या टोकाला जाऊ लागली आणि लोकसभेमुळे या नाराजीत आणखी भर पडल्याचे चित्र आहे. अर्थात राजकीय नेत्यांची वा पक्षाची स्वतःची अशी काही गणिते व आडाखे असतात. निवडणुकीच्या राजकारणाचे आकलन वेगळे असते; परंतु जर ही गणिते चुकताना दिसत असतील तर त्याचे काय करायचे, हा प्रश्न उपस्थित होतोच. तसेच, कार्यकर्त्यांमधील अस्वस्थतेमागे राष्ट्रवादीचा समावेश हे वरकरणी मुख्य कारण दिसत असले तरी तेवढेच एक मुख्य कारण आहे असे मुळीच नाही. ते केवळ हिमनगाचे टोक आहे.”

“सेनेशी युती नैसर्गिक, मात्र राष्ट्रवादीशी नाही!”

कार्यकर्त्यांमधून नेता बनवण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेचे पालन करणारा भाजप हा एकमेव पक्ष असल्याचा दावाही या लेखामध्ये करण्यात आला आहे. मात्र, आता हीच प्रक्रिया बाजूला सारली जात असल्याची साशंकता व्यक्त करत या लेखामध्ये म्हटले आहे की, “आज पक्षाच्या मूळ कार्यकर्त्याला स्थान काय आणि पक्षामध्ये बाहेरून आलेल्यांना स्थान काय, याचा साकल्याने विचार होण्याची गरज आहे. याचा अर्थ बाहेरून आलेला प्रत्येक जण चुकीचा आहे असा निश्चितच नाही. कित्येक जण आज संघटनेसाठी, विचारधारेसाठी प्रभावीपणे काम करत आहेत. पक्षफोडीचा भाजपावर आरोप करणार्‍यांनी स्वतः महाराष्ट्रात अख्खे पक्ष फोडाफोडी करून उभारलेले आपण पाहिलेले आहेत. मात्र जर ‘भाजपामध्ये बाहेरून आलेले…’ अशा प्रकारचा ‘नॅरेटिव्ह’ जर तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत विरोधक यशस्वीपणे पोहोचवत असतील तर तो का पोहोचतो आहे, याचा विचार करण्यावाचून गत्यंतर नाही.” या वर्षी ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या आणीबाणीविरोधी संघर्ष आणि राम मंदिर आंदोलनादरम्यानच्या दिलेल्या योगदानाचे ‘नॅरेटीव्ह’ तरुण मतदारांच्या पचनी पडेल का, असा प्रश्नही या लेखात उपस्थित करण्यात आला आहे. लेखामध्ये म्हटले आहे की, “समाजात काही ना काही विचार करणार्‍या सुशिक्षित वर्गापुढे जाताना आपण या मंडळींपुढे काय नॅरेटिव्ह मांडतो आहोत, हे पाहणेही महत्त्वाचे ठरते. उदाहरणार्थ आणीबाणीच्या काळातील संघर्ष वा रामजन्मभूमीसाठी कार्यकर्त्यांनी केलेला त्याग, सांडलेले रक्त याबाबत त्याला आदर जरूर आहे. राम मंदिर निर्माण झाल्याचा त्याला निस्सीम आनंदही जरूर आहे; परंतु हे मुद्दे मतदान करताना वय वर्षे ४०-४५ च्या आतील सुशिक्षित मतदात्यांसाठी किती प्रभावी ठरतील? भले तो मतदार अगदी हिंदुत्ववादी असला तरी तरुण कार्यकर्ता म्हणून काम करताना ३०-४० वर्षांपूर्वीचे संदर्भ त्याला भावणारे नाहीत.”

भाजपाची अजित पवारांबाबत नेमकी भूमिका काय? ‘विवेक’मधील लेखानंतर मुनगंटीवारांचं स्पष्टीकरण, हिंदी डायलॉग मारून म्हणाले…

पुढे या लेखामध्ये म्हटले आहे की, “कित्येक कार्यकर्ते असे आहेत, की जे आपापल्या नोकरी-व्यवसाय-उद्योगात प्रचंड यशस्वी आहेत, त्यांना कोणत्याही राजकीय लाभाची गरज नाही तरी एक विचारधारा म्हणून आपापल्या परीने ते हिंदुत्वाशी संबंधित काही ना काही काम करत आहेत. त्यांचे म्हणून आपापल्या भागांत एक प्रभावक्षेत्र आहे, ’नेटवर्क’ आहे. या मंडळींना ’आमचे स्थान काय’ असे म्हणताना आमच्या मताला, म्हणण्याला स्थान काय, असा अर्थ अभिप्रेत होता. त्या त्या भागांतील स्थानिक हिंदुत्वाशी संबंधित, गव्हर्नन्सशी संबंधित, उद्योग-व्यवसाय-अर्थकारण, शिक्षण-रोजगार आणि एकूणच नागरी जीवनाशी संबंधित कोणते मुद्दे आपण मार्गी लावले, ते लोकांपर्यंत किती प्रमाणात व कशा प्रकारे पोहोचवले आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या सार्‍यात या मंडळींना प्रत्यक्षात किती स्थान होते… या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे या मंडळींना मिळालेली नाहीत, हे वास्तव आहे.

सरसंघचालक मोहन भागवतांनीही केली होती टीका

लोकसभा निवडणुकीनंतर, नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यकर्ता विकास वर्ग द्वीतीय या समारंभाला संबोधित करत असताना मोहन भागवत यांनी अप्रत्यक्षपणे नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका केली होती. “लोकशाहीत निवडणूक ही अनिवार्य प्रक्रिया आहे. यात दोन पक्ष असल्याने स्पर्धा राहायला हवी. मात्र, हे युद्ध नाही. प्रचारादरम्यान ज्या पद्धतीने टीका झाली त्यातून समाजात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. आता निवडणुका आटोपल्या असून ‘एनडीए’चे सरकार स्थापन झाले आहे. निवडणूक प्रचारात जो अतिरेक झाला त्यापासून दूर होत समस्यांवर चर्चा व्हायला हवी. त्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी सहमतीच्या राजकारणावर लक्ष द्यायला हवं”, अशी अपेक्षा सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली. मणिपूरबाबतही मोहन भागवत यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले होते. “मागच्या वर्षभरापासून अधिक काळ मणिपूर जळतंय, मणिपूरचा विचार करुन तिथे शांतता प्रस्थापित करणं आवश्यक आहे. हे कुणी घडवून आणलं आहे? याकडे लक्ष दिलं पाहिजे. अजून बरीच कामं करायची आहेत. सगळी कामं सरकार करणार नाही. मणिपूर अनेक वर्ष शांत होतं. आता पुन्हा पेटलं आहे. जुने वाद बंद जाले पाहिजेत. द्वेषाचं वातावरण निर्माण झाल्याने मणिपूरमध्ये त्राहीमाम परिस्थिती आहे. त्यामुळे मणिपूर शांत करण्यासाठी प्राधान्य देणं आवश्यक आहे.” असेही मोहन भागवत म्हणाले होते.

हेही वाचा : हातकणंगल्यात शिंदे गटाला मदत करणारी अदृश्य शक्ती कोणती ?

संघाचे मुखपत्र असलेल्या ‘ऑर्गनायझर’मधून सडकून टीका

‘ऑर्गनायझर’मध्ये नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका लेखामध्ये असे म्हटले होते की, या लोकसभा निवडणुकीकरिता भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते संघाकडे मदत मागण्यासाठी आलेच नाहीत; त्याचाच परिणाम म्हणून पक्षाने इतकी खराब कामगिरी केली आहे. लोकसभा निवडणुकीचा हा निकाल अतिआत्मविश्वासात असलेल्या भाजपाला वास्तवाची जाणीव करून देणारा आहे. तसेच भाजपाचे नेते प्रत्यक्ष मैदानात उतरून प्रचार करण्याऐवजी समाजमाध्यमांवर पोस्ट्स शेअर करण्यात व्यग्र होते, असा टोलाही या लेखामध्ये लगावण्यात आला आहे. भाजपाचे नेते आपापल्या कोषात आनंदात बसले होते; ते लोकांचे म्हणणे ऐकायला प्रत्यक्ष जमिनीवर उतरलेच नाहीत. भाजपाला कानपिचक्या देणारा हा लेख राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आजीव सभासद असलेल्या रतन शारदा यांनी लिहिला होता. त्यांनी लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून भाजपाच्या मातृसंघटनेकडे पाहण्याच्या दृष्टिकोनामध्ये झालेल्या बदलांविषयीची अस्वस्थता व्यक्त होत आहे. शारदा यांनी आपल्या लेखामध्ये असेही म्हटले आहे, “फक्त आम्हालाच राजकारण कळते आणि संघासारख्या इतर संघटनेमधील लोक अडाणी आहेत, असे मानणाऱ्या भाजपा नेत्यांचा अहंकार अत्यंत हास्यास्पद आहे.” मोदींच्या करिष्म्यालाही काही मर्यादा असल्याचे या लेखात नमूद करण्यात आले होते. “सर्वच्या सर्व ५४३ मतदारसंघांतील निवडणूक मोदींनी अथवा मोदींच्या चेहऱ्यावर लढवली जावी, या संकल्पनेला काही मर्यादाही आहेत. जेव्हा उमेदवार बदलला जातो वा स्थानिक नेत्याला डावलले जाते वा इतर पक्षातील आयारामाला उमेदवारी दिली जाते, तेव्हा हीच संकल्पना कुचकामी ठरते. आयारामांना संधी देण्यासाठी चांगले काम करणाऱ्या खासदाराला डावलण्यामुळे नक्कीच दु:ख होते”, अशाही भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.