सुहास सरदेशमुख

एवढी वर्षे औरंगाबाद जिल्हा वार्षिक आराखड्याच्या तरतुदीवरील शहरी पगडा पालकमंत्री पदी संदिपान भुमरे यांच्या निवडीनंतर कमी झाला असून या वर्षी बिघडलेल्या रोहित्रांसाठी ३५ कोटी रुपयांचा निधी राखून ठेवू, असे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी नुकतेच एका जाहीर कार्यक्रमात सांगितले. भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी सादरीकरण करताना योजना मोठी गोंडस दिसते. पण प्रत्यक्षातील अडचणी आणि आखलेली योजना यात तफावत असल्याने आता शेतरस्त्यांसाठी प्रतिकिलोमीटर २४ लाख रुपयांपर्यंतचा निधी वाढवून दिला असल्याचा दावा त्यांनी केला.

Contractual workers of Navi Mumbai civic body to launch strike for equal pay
नवी मुंबईत कंत्राटी सफाई कामगारांचे आंदोलन सुरु ! पालिकेने नाका कामगारांकडून  कचरा संकलन सुरु केल्याचा दावा…
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
ramabai Ambedkar hoarding vandalized
माता रमाई आंबेडकर यांच्या फलकाचा अवमान; कोपरगाव शहर बंद, शहरात तणाव, मोठा जमाव रस्त्यावर
ichalkaranji municipal corporation
इचलकरंजी महानगरपालिकेचा एक हजार कोटींचा जीएसटी परतावा मिळावा, राहुल आवाडे यांची मागणी
Chief Minister Devendra Fadnavis gave a strong response after Rahul Gandhi criticism
दिल्लीच्या निकालानंतर काँग्रेस संपेल…मुख्यमंत्र्यांनी थेट तारीखच…
26 highly dangerous buildings in Thane are occupied by residents municipality issued notices four months in advance
ठाण्यात २६ अतिधोकादायक इमारती रहिवास व्याप्त, चार महिने आधीच खबरदारी घेत पालिकेने बजावल्या नोटीसा
Honaji Tarun Mandal celebrating its centenary silver jubilee unveiled new statue of Ganesh Destroyer this year
होनाजी तरुण मंडळाची नवी ‘संहारक गणेश मूर्ती’ गणेश जयंतीला प्रतिष्ठापना
upper tehsil office at ashvi in sangamner taluka
संगमनेर तालुक्यातील आश्वी येथे अप्पर तहसील कार्यालय

हेही वाचा >>>निवडणूक आयोगाच्या सुनावणीआधी बावनकुळे-शेलार यांची शहांशी चर्चा

भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांचे अनुभव आपल्या ग्रामीण बेरकी शैलीत सांगताना भुमरे म्हणाले, ‘झाडं किती मोठी झाल्यावर एकमेकांना खेटतात, अन् त्यासाठी ती किती अंतरावर लावावी लागतात ? मग त्याला निकष कशासाठी? ज्यांना शेतीतले काही माहीत नसते, ते निकष ठरवतात. त्यामुळे आता हे असले अंतराचे नियम बदललेले आहेत. ग्रामीण भागातील खरी अडचण असते ‘डीपी’ची. ती जळते, त्यातील ऑईल संपते. मग शेतकरी हैराण होतात. त्यामुळे आता तातडीने ‘डीपी’ बदलण्यासाठी ३५ ते ४० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्याचा विचार आहे.’

हेही वाचा >>>राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा असलेल्या चंद्रशेखर राव यांच्यापुढे तेलंगणाची सत्ता राखण्याचे मोठे आव्हान

दरम्यान, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून रोहित्र देखभाल दुरुस्तीसाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना आहेत. पण बऱ्याचदा मागणी खूप तातडीची असते. जोपर्यंत कागदोपत्री रोहित्र मंजूर होत नाही तोपर्यंत ते बसविता येत नाही. यासाठी सरासरी पाच लाख रुपयांपर्यंतचा खर्च येत असतो. अलीकडेच आमदार व खासदारांच्या निधीतूनही रोहित्रासाठी मदत करण्यास मंजुरी देण्यात आली असल्याचे महावितरणचे सहसंचालक मंगेश गोंदावले यांनी सांगितले. या वर्षी ‘डीपी’साठी अधिकचा निधी मंजूर करून औरंगाबादच्या वार्षिक आराखड्यावर आता ग्रामीणचा वरचष्मा असेल असे सांगण्यात येत आहे. चांगला पाऊस झाल्याने या वर्षी शेतीमध्ये वीज उपलब्ध झाल्यास रब्बी हंगाम अधिक चांगला होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे रोहित्र दुरुस्तीसाठीचा निधी उपयोगी पडू शकतो.

हेही वाचा >>> निवडणूक आयोगाच्या सुनावणीआधी बावनकुळे-शेलार यांची शहांशी चर्चा

औरंगाबाद जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी या पूर्वी सुभाष देसाई, रामदास कदम यांनी काम पाहिले. रामदास कदम यांचा कार्यकाळ वादग्रस्तच राहिला. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे महत्त्व कमी करण्यासाठी त्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या निधीचाही उपयोग केला. निधी वितरणात शहरी पगडा असे. शहरातील तीन मतदारसंघ आणि महापालिकेतील पदाधिकारी सांगतील तशी बैठकीतील चर्चा रंगत असे. आता मात्र ग्रामीण पगडा दिसू लागण्याची चिन्हे आहेत.

Story img Loader