नवी दिल्ली ; राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला ‘घड्याळ’ चिन्ह वापरण्यापासून रोखण्यासाठी शरद पवार गटाने केलेल्या याचिकेवर गुरुवार, २४ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्या. सूर्यकांत आणि न्या. उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होईल. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत २९ तारखेला संपणार असल्यामुळे तत्पूर्वी याबाबत निर्णय दिला जावा, अशी याचिकाकर्त्यांची अपेक्षा आहे.

हेही वाचा >>> Supriya Sule : “मला जे अजितदादा आठवतात त्यांना दिल्लीला जाणं आवडत नाही, कारण…”; सुप्रिया सुळेंचं वक्तव्य

Gold & Silver Price Hike: Record High Rates Before Diwali
Gold Silver Price : दिवाळीच्या तोंडावर सोन्याच्या किंमतीत विक्रमी वाढ! चांदीचा दर ९० हजाराच्या पुढे; खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या आजचा दर
22nd October Rashi Bhavishya In Marathi
२२ ऑक्टोबर पंचांग: जन्मराशीनुसार आज कर्तुत्वाला मिळेल चांगला…
Discrimination by Mumbai Municipal Corporation,
वैद्यकीय विमा योजनेत मुंबई महापालिकेची सापत्न वागणूक, खर्चावरील मर्यादा निश्चितीमुळे कर्मचारी नाराज
avinash jadhav bjp
टोलमुक्तीनंतर श्रेय मिळविण्यासाठी चढाओढ
violence against women, Three-faced Ravan burnt,
महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचा निषेध, पुण्यात शरद पवार गटाकडून तीन तोंडी रावणाचे दहन
Government decision to issue Kunbi caste certificate to relatives of Marathas in the state where Kunbi is registered Mumbai print news
मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयाला आव्हान: ओबीसी संघटनेच्या याचिकेवर उत्तर दाखल करण्यास सरकारला मुदतवाढ
Shiv Sena Shinde group former corporator Vikas Repale received death threat
शिंदेच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक विकास रेपाळे यांना जीवे मारण्याची धमकी
Another option for repairing the Malabar Hill Reservoir
मुंबई : मलबार हिल जलाशयाच्या दुरुस्तीसाठी अन्य पर्याय

पक्षाच्या दोन्ही गटांना चिन्हाच्या वापरापासून रोखण्याच्या मागणीसाठी ही याचिका करण्यात आली आहे. शरद पवार गटाच्या वकिलांनी मंगळवारी न्यायालयाला सांगितले की, याचिकेवर आज सुनावणी होणे अपेक्षित होते. मात्र खटल्यांच्या सूचीमध्ये याचा समावेश नाही. त्यावर, ‘यापूर्वीच न्यायालयाने यासंदर्भात आदेश दिला होता आणि तो दोन्ही बाजूंनी मान्य करण्यात आला होता,’ असे न्यायालयाने म्हटले. मात्र अजित पवार गटाकडून आदेशाचे पालन होत नसल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला. विधानसभा निवडणुकीत अर्ज भरण्याची मुदत २९ तारखेला संपणार असल्याने याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती वकिलांमार्फत शरद पवार गटाने केली. तर आपल्या काही उमेदवारांनी याआधीच अर्ज भरल्याचा मुद्दा अजित पवार गटाने मांडला.