पुणे/बारामती : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. कोणत्या मतदारसंघामध्ये कोणता उमेदवार द्यायचा, याबाबतचा एकत्र निर्णय घेण्यात येणार असून जागावाटपाची चर्चा येत्या दहा दिवसांत पूर्ण होईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी दिली.

विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस हे तीन पक्ष महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार आहेत. त्यानुसार महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू झाली आहे. काही जागांवरील गणिते आणि उमेदवारांच्या नावावर सहमती झाली आहे. पण, काही जागांवर तिन्ही पक्षांनी दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर बारामती दौऱ्यावेळी शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना दहा दिवसांत जागा वाटपाची प्रक्रिया पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला.महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू झाली आहे. कुठल्या मतदारसंघात कोणत्या पक्षाचा उमेदवार द्यायचा, याचा एकत्रित निर्णय घेतला जाईल, असे पवार यांनी सांगितले.

Ahead of municipal elections Congress office bearers are leaving party in Navi Mumbai
आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षफुटीचे सत्र सुरू, माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांची काँग्रेसला सोडचिट्ठी
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Ajit pawar gives Sharad Pawar Health Update
Sharad Pawar Health Update: शरद पवारांच्या प्रकृतीबाबत अजित पवारांची महत्त्वाची माहिती; म्हणाले, “त्यादिवशीच त्यांना…”
Sharad pawar Health Update
Sharad Pawar Health Update : शरद पवारांची प्रकृती बिघडली, नियोजित कार्यक्रम रद्द!
necessary to remain constantly alert for disaster prevention says Sharad Pawar
आपत्ती निवारणासाठी सतत सतर्क राहणे गरजेचे – शरद पवार
Sharad Pawar on Uday Samant
Sharad Pawar: पुन्हा राजकीय भूकंप होणार? शरद पवारांचे एका वाक्यात उत्तर; म्हणाले, “मी वाट बघतोय…”
Ramdas Athawale appeal Sharad Pawar NDA
शरद पवार यांनी एनडीएमध्ये यावे – रामदास आठवले यांचे आवाहन
State Sports Minister Datta Bharane reaction on sharad pawar and ajit pawar coming togather
“शरद पवार, अजित पवार एकत्र आले तर…”, दत्ता भरणेंच्या वक्तव्याची चर्चा

ते म्हणाले की, राज्यातील नागरिक परिवर्तनासाठी इच्छुक आहेत. आठ ते दहा दिवसांमध्ये तिन्ही पक्षांचे उमेदवारांबाबतचे एकमत होईल. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनतेचा कौल महाविकास आघाडीच्या बाजूने होता. हीच परिस्थिती विधानसभा निवडणुकीतही दिसून येईल.

Story img Loader