लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘एक देश एक निवडणूक’ असावी, अशी भूमिका मांडत असतानाच जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणूक जाहीर केली जाते आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक नंतर होईल असे सांगितले जाते. यातून पंतप्रधानांच्या बोलण्यातील विरोधाभास प्रकट होतो, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली.

Harshvardhan Patil
Harshvardhan Patil : भाजपाला धक्का! हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश, विधानसभा निवडणूकही लढवणार
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Prime Minister Narendra Modi Home Minister Amit Shah visit Thane district
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात भाजपची मोर्चेबांधणी सुरू; पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचा ठाणे जिल्हा दौरा
sharad pawar loyalist jayant patil criticized amit shah narendra modi
मोदी व शहा यांचे आम्ही आभार मानतो, त्यांनी आमच्या पक्षातील सर्व दोष त्यांच्याकडे  घेतले – प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे प्रतिपादन
Ajit pawar wanted to become chief minister
Ajit Pawar : “मला मुख्यमंत्री व्हायचंय, पण…” अजित पवारांचं मोठं विधान; खंत व्यक्त करत म्हणाले…
Arvind Kejriwal latest marathi news
विश्लेषण: केजरीवाल यांच्या घोषणेने भाजपची अडचण? मुदतपूर्व निवडणुकीमागे आत्मविश्वास की जुगार?
41 aspirants in eight constituencies of pune NCP Sharadchandra Pawar party preparing for assembly
शहरातील आठ मतदारसंघांत ४१ इच्छुक, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विधानसभेची तयारी
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule : लोकसभेला महायुतीच्या काय चुका झाल्या? चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान; म्हणाले, “आम्हाला अंदाजच नव्हता…”

ते शनिवारी नागपूर येथील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होते. पवार म्हणाले, पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात संपूर्ण देशात एकाचवेळी निवडणुका घेण्याची कल्पना मांडली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी जम्मू-काश्मीर आणि हरियाणाच्या निवडणुका जाहीर झाल्या. पण झारखंड आणि महाराष्ट्राच्या निवडणुका जाहीर झाल्या नाहीत. याबद्दल अधिक स्पष्टीकरण अपेक्षित आहे. महाराष्ट्रातील निवडणुकांचे चित्र स्पष्ट झाल्याशिवाय पंतप्रधानांच्या घोषणेला योग्य कसे समजायचे, असा प्रश्नही पवारांनी उपस्थित केला.बांगलादेशातील घटनांची प्रतिक्रिया भारतात काही ठिकाणी उमटली आहे. मात्र महाराष्ट्रात त्याचे विशेष परिणाम दिसत नाहीत, असेही पवार यांनी सांगितले.