सातारा : शासनाने जाहीर केलेली ‘लाडकी बहीण’सह इतर योजना या फसव्या असून, शासनाकडे असलेला निधी आणि घोषित केलेल्या योजना यात खूप अंतर दिसत आहे. मुलींच्या मोफत शिक्षणाचा निर्णय चांगला आहे. मात्र, राज्याची आर्थिक स्थिती पाहता त्यांनी जाहीर केलेल्या योजना संपूर्ण राज्यात लागू होण्याबाबत शंकाच असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

जकातवाडी (ता. सातारा) येथील एका कार्यक्रमानंतर शरद पवार पत्रकारांशी बोलत होते. या वेळी माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार लक्ष्मण माने आदी उपस्थित होते.

Electricity system Maharashtra, strike employees,
राज्यातील वीज यंत्रणा कोलमडणार! कर्मचाऱ्यांनी पुन्हा उगारले संपाचे अस्त्र
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Goshalas, Maharashtra, Goshalas subsidy,
राज्यातील १३५ गोशाळांना झाली मोठी मदत; जाणून घ्या, राज्य सरकारने किती गोशाळांना दिले अनुदान
kolkata doctor rape case trinamool congress vs bjp controversy more intense after sc comment
सुनावणीनंतर राजकीय वाद; निदर्शनांमागे केंद्राचे कारस्थान बॅनर्जी; चेहरा उघड झाल्याची भाजपची टीका
Thane education officer, suspension,
ठाण्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांना निलंबनाबाबत तूर्त दिलासा नाही, राज्य सरकारला राक्षे यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश
uddhav thackeray latest marathi news,
“सरकार उलथून टाकण्यासाठी एकत्र या”, उद्धव ठाकरे यांचे सरपंचांना आवाहन
badlapur case protest mahavikas aghadi
राजकीय पक्षांना बंद पुकारण्याचा अधिकार आहे का? बदलापूर प्रकरणातील बंदविरोधात न्यायालयाने काय निर्णय दिला?
Ajit Pawar in trouble again due to controversial statement
वादग्रस्त विधानाने अजित पवार पुन्हा अडचणीत

हेही वाचा >>> शरद पवार गटाला देणग्या स्वीकारण्याची मुभा; केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दिलासा

पवार म्हणाले, की सरकारचा अर्थसंकल्प झाल्यानंतर सहा महिन्यांनी पुरवणी मागण्या मांडल्या जातात. मात्र, या वेळी राज्य सरकारने आठ दिवसांत पुरवणी मागण्या मांडल्या. त्यामुळे माझा असा अनुभव आहे, की राज्य सरकारने जाहीर केलेल्या योजना या फसव्या आहेत आणि त्या पूर्ण राज्यभर लागू होऊ शकत नाहीत. राज्यात लोकसभेप्रमाणेच धक्कादायक निकाल लागतील. सगळीकडे सरकारविरोधात वातावरण आहे. त्याचा फायदा नक्कीच आम्हाला होईल.

आम्हाला लोकसभेला तुतारी आणि पिपाणी या निवडणूक चिन्हांचा फटका बसला. साताऱ्यात विजय आमचाच होता. आमचे चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आहे. मात्र, अनेक ठिकाणी तुतारीच्या विरोधात पिपाणी वाजवणारा माणूस निशाणी ठेवण्यात आली होती. त्याचा फटका आम्हाला बसला. मनोज जरांगे आणि मराठा आरक्षण या प्रश्नावर ते म्हणाले, ‘महाराष्ट्र सरकारकडून आज विधानसभेचे कामकाज झाले नाही असे माझ्या वाचण्यात आले आहे. त्यामुळे काही निर्णय झाला नाही.