नाशिक : आमदार आदित्य ठाकरे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान सभेतून शिवसेना ठाकरे गटाने विधानसभेच्या अधिकाधिक जागांवर दावेदारी करण्याची रणनीती आखली आहे. गेल्यावेळी विधानसभेच्या ज्या जागा लढल्या नव्हत्या, त्यावरही लोकसभा निवडणुकीतील यशामुळे ठाकरे गटाचे लक्ष आहे. यातून नाशिक जिल्ह्यातील १५ पैकी आठ मतदारसंघांवर दावा सांगितला गेल्याने महाविकास आघाडीत जागा वाटपावरून संघर्ष अटळ आहे.

राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेपाठोपाठ ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांनी देखील महाराष्ट्र स्वाभिमान सभा अभियान नाशिकपासून सुरु केले आहे. पहिल्या दिवशी ठाकरेंनी शहरात पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. दुसऱ्या दिवशी येवला येथे शेतकरी आणि मनमाडमध्ये शिवसैनिकांशी संवाद साधला. येवला आणि नांदगाव हे महाविकास आघाडीच्या दृष्टीने बंडखोरांचे मतदारसंघ. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ हे येवल्याचे तर, शिवसेना शिंदे गटात सर्वात आधी सहभागी झालेले आमदार सुहास कांदे हे नांदगावचे प्रतिनिधित्व करतात. महाराष्ट्र स्वाभिमान सभेसाठी नाशिक मध्यसह या उपरोक्त मतदारसंघाची जाणीवपूर्वक निवड करुन मोर्चेबांधणी करण्यात येत आहे.

LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
11th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
११ सप्टेंबर पंचांग : प्रीती योग कोणाच्या नशिबाचे उघडणार कुलूप? व्यवसायात लाभ तर मान-सन्मानात होईल वाढ; वाचा तुमचे भविष्य
Miraj Assembly Constituency Suresh Khade in Miraj Vidhan Sabha Election 2024
कारण राजकारण : पश्चिम महाराष्ट्रात कमळ फुलवणारा आमदारच अडचणीत
shivsangram marathi news
‘शिवसंग्राम’मध्ये उभी फूट; ‘स्वराज्य संग्राम’ची घोषणा
vijay wadettiwar criticized shinde govt
“महाराष्ट्राचं भल व्हावं, असं वाटत असेल तर…”; नितेश राणेंच्या ‘त्या’ विधानावरून विजय वडेट्टीवारांचं शिंदे सरकारवर टीकास्र!
Industrial Smart Cities
Modi in Mumbai: पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याला आंदोलनाचे ग्रहण; वाढवणमधील मच्छिमार, काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा
Nashik, Sanjay Pandey, Vichar Manch, Sanjay Pandey vichar Manch, Rashtriya Janhit Paksha, Deolali constituency,
संजय पांडे विचार मंचाची १० जागा लढण्याची तयारी
Maharashtra Police
Nagpur : हवालदाराच्या लेखणीमुळे १,१०० हून अधिक गुन्हेगार गजाआड; राष्ट्रपतींनीही घेतली दखल

हेही वाचा…Shakti Bill Update: बदलापूर प्रकरणानंतर शक्ती कायद्याची पुन्हा चर्चा; बलात्काऱ्यांना कडक शिक्षा देणारा कायदा का रखडला?

लोकसभा निवडणुकीत नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही जागांवर महाविकास आघाडीने मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवला. त्यामुळे आघाडीतील तिन्ही पक्षांना आपली ताकद वाढल्याचे वाटत असून प्रत्येकाकडून विधानसभेच्या अधिकाधिक जागा मिळवण्यासाठी चढाओढ सुरू आहे. आदित्य ठाकरे यांच्या सभेत जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी तोच विषय मांडला. जिल्ह्यात ठाकरे गटाची मोठी ताकद आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत १५ पैकी किमान आठ जागा ठाकरे गटाला देण्याची मागणी त्यांनी केली. अर्थात यावर आदित्य यांनी कोणतेही भाष्य केले नाही.

हेही वाचा… पिंपरीत भाजपमधील गटबाजीला उधाण

मात्र, सभेतून मित्रपक्षांना योग्य तो संदेश दिला गेला. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपशी युती करणाऱ्या एकसंघ शिवसेनेने देवळाली, सिन्नर, निफाड, नांदगाव, मालेगाव बाह्य, इगतपुरी, दिंडोरी आणि कळवण-सुरगाणा या आठ जागा लढविल्या होत्या. यातील केवळ मालेगाव बाह्य आणि नांदगाव या दोन ठिकाणी विजय मिळू शकला. पक्ष दुभंगल्यानंतर या मतदारसंघातील अनुक्रमे दादा भुसे आणि सुहास कांदे हे दोन्ही आमदार शिंदे गटात गेले. म्हणजे ठाकरे गटाचा सध्या जिल्ह्यात एकही आमदार नाही. तथापि, नाशिक लोकसभेत राजाभाऊ वाजेंच्या विजयाने समीकरणे बदलली. त्याचा पुरेपूर लाभ उठविण्याचे धोरण ठाकरे गटाने ठेवले आहे. त्यामुळेच आदित्य ठाकरेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान सभेची सुरुवात गतवेळी काँग्रेसने लढविलेल्या नाशिक मध्य मतदारसंघातून झाल्याचे मानले जाते.