प्रशांत देशमुख 

वर्धा जिल्ह्यात शिवसेनेच्या नवनिर्माणाचे प्रयत्न सुरू झाले असून त्याचाच भाग म्हणून ठाण्याचे दिवंगत झुंजार शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या तालमीत तयार झाल्याचा दाखला देणारे जिल्ह्याचे नवे संपर्कप्रमुख बाळा राऊत हे संपर्कप्रमुख म्हणून आले. पण ठाणे महापालिका निवडणुका तोंडावर असताना राऊत हे ठाण्यातून वर्धा जिल्ह्याशी कितपत संपर्क ठेवतील अशी शंका शिवसैनिकांना सतावत आहे. 

Eknath shinde loksatta news
रायगड, नाशिकच्या पालकमंत्रीपदांचा तिढा लवकरच सुटेल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Bombay HC urges Abhishek and Abhinandan to resolve trademark dispute
व्यापारचिन्हाबाबतचा वाद सौहार्दाने सोडवण्याचा प्रयत्न करा; उच्च न्यायालयाचा अभिषेक आणि अभिनंदन लोढा बंधुंना सल्ला
रस्त्याच्या मधोमध अचानक करू लागला विचित्र प्रकार, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं…
Supriya Sule in audience in Ajit Pawar event
नाराजीनाट्याचा पुढचा अंक इंदापुरात! नक्की काय घडले ? अजित पवार व्यासपीठावर तर खासदार सुप्रिया सुळे प्रेक्षकांत
Raj Thackeray upset factionalism MNS nashik
मनसेतील गटबाजीने राज ठाकरे नाराज; जिल्हा, शहर कार्यकारिणी बरखास्तीची शक्यता
Viral video of baraat where friend took groom and bride on shoulder and danced video viral on social media
वरातीत मित्राने केला राडा! एका खांद्यावर नवरदेव तर दुसऱ्या खांद्यावर नवरी, VIDEO पाहून तुम्हीच सांगा हे कितपत योग्य
badlapur biogas project in controversy again after bjp corporator allegations
बदलापुरात एका तपानंतरही बायोगॅसची प्रतीक्षाच; भाजपच्या नगरसेवकाच्या आरोपानंतर बायोगॅस प्रकल्प पुन्हा वादात

तक्रारींच्या वादळात अनंत गुढे यांचे संपर्कप्रमुख हे पद दोन दिवसापूर्वी गेले. आता ठाण्याचे माजी नगरसेवक बाळा राऊत यांची नियुक्ती झाली. मंगळवारी त्यांनी घेतलेल्या पहिल्या बैठकीत गटबाजी खपवून घेतली जाणार नसल्याचे ठणकावून सांगितले. माझे नेते आनंद दिघे हे बोलण्यापेक्षा कामाला महत्त्व द्यायचे. माझाही तोच पिंड आहे. त्यामुळे जो काम करेल, त्याची दखल घेऊ, असे राऊत यांनी स्पष्ट केले. याच सभेत स्थानिक सेना नेत्यांनी पूर्वसूरींच्या कारभारावर जाहीर ताशेरे ओढल्याने राऊतांचा इशारा दिशा स्पष्ट करणारा ठरतो. 

गत चार वर्षात गुढे यांनी केलेल्या कामावर सतत वाद उसळले होते. विश्रामगृहावर महिन्याभरापूर्वी झालेला तमाशा प्रथम समाजमाध्यमावर व नंतर संघटनेत गाजला.सतत गटबाजी उसळत असल्याने निष्ठावंत सैरभैर झाले होते. कामापेक्षा हुजऱ्यांची चलती असल्याचे ते बोलत. पदांचा व्यापार होत असल्याचे जाहीर आरोप  तर निष्ठावंतांना खजील करणारा ठरत होता. राज्यात अडीच वर्षांपासून पक्षाची सत्ता आहे. मात्र तरीही स्थानिक नेते विरोधी पक्षात असल्यासारखे बेदखल झाल्याची भावना हाेती. हिंगणघाटच्या एका युवा सैनिकाने थेट जाहीर पत्र लिहून पक्षांतर्गत नाराजीला वाचा फोडली होती. त्याचे दूसऱ्याच दिवशी पद गेले. पक्षाचा बालेकिल्ला राहिलेल्या हिंगणघाटचे माजी आमदार अशोक शिंदे यांनी कारभारावर नाराजी व्यक्त करीत पक्ष सोडला. पक्षाने मंत्रीपद व महत्त्वाचे उपनेतेपद दिलेले शिंदे पक्ष का सोडतात, याची विचारपूसही झाली नाही. त्यांच्या नंतर अनेक नेत्यांनी पक्ष कार्याशी दुरावाच ठेवला. केव्हाही नियुक्ती व कधीही बरखास्ती, असे चित्र राहिले. जिल्ह्याच्या राजकारणात दखलपात्र राहिलेल्या शिवसेनेचे आसन भाजपने कधी ओढून घेतले, हे सेना नेत्यांना समजलेच नाही. मात्र सेनेशी

शंभर टक्के निष्ठा ठेवणारे लढवय्ये नेते पक्षात कायम आहेत. माजी जिल्हाप्रमुख व मुंबई कार्यालयाशी संपर्कात असणारे रविकांत बालपांडे यांनी राऊतांच्या सभेत गटबाजी सोडल्याशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट केले. त्याचीच री राऊतांनी ओढली. लोकसत्ताशी बोलतांना बालपांडे म्हणाले की काही कारणास्तव पक्षाची प्रतिमा मलिन झाली. सूसूत्रता राहिली नाही. दिवाकर रावते हे जबाबदारी सांभाळत होते तेव्हा संघटनेला असलेले महत्त्व आता कमी झाले आहे. नेते थेट हमरीतुमरीवर येतात. संघटना निष्ठा महत्त्वाची राहिली पाहिजे. पक्षाचे काम करणाऱ्या नेत्याची लोकांपुढे जातांना एक निडर प्रतिमा असली पाहिजे. हेच आपण वरिष्ठांना सांगितले आहे.

संपर्कप्रमुख राऊत हे जिल्ह्यात कितपत लक्ष घालतील,याविषयी शंकेचे काहूर आहे. या नेत्यासमोर ठाण्याच्या  आगामी महानगरपालिका निवडणुकांचे आव्हान आहे. ते वर्धा जिल्ह्यात कितपत वेळ देणार व गटबाजीला कसा आवर घालणार, याचे तूर्तास उत्तर कुणाकडेही नाही. ते कोणत्या स्थानिक नेत्याच्या माध्यमातून काम पाहतील, याचीही उत्सुकता शिवसैनिकांना लागली आहे. गुढेंनी नेमलेले पदाधिकारी सध्या कायम आहेत. पुढे काय, याच विवंचनेत शिवसैनिक बसले आहे.

Story img Loader