राजकारणात अनेक पक्षांनी एकत्र येऊन आघाडी वा युती स्थापन करणे ही बाब परवलीची झाली आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाकडे स्वबळावर असलेले बहुमत संपुष्टात आल्यानंतर आता केंद्रात एनडीए आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सत्ताधारी एनडीए आघाडी आणि विरोधातील इंडिया आघाडी यांच्यामधील राजकारण सुरू झाले आहे. भारताच्या इतिहासात अनेकदा कोणाही एकट्या पक्षाला बहुमत मिळालेले नाही. अशावेळी समविचारी पक्ष एकत्र येतात आणि आघाडी स्थापन करून सत्ता काबीज करतात. विरोधकही सत्ताधारी पक्षाविरोधात वा आघाडीविरोधात एकजूट व्यक्त करण्यासाठी अशाच प्रकारे एकत्र येताना दिसतात. या प्रकारचे राजकारण गेल्या ५०-६० वर्षांमध्ये वारंवार दिसून आले आहे. राज्या-राज्यांमध्ये काळ आणि परिस्थितीनुसार झालेल्या अशा युतींना तर गणतीच नाही. भारतात हे आघाडीचे राजकारण कधीपासून सुरू झाले आणि त्याचा आजवरचा प्रवास कसा राहिला आहे ते पाहूयात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा