लोकसत्ता प्रतिनिधी

नागपूर : महायुती सरकारच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार हे अद्याप ठरले नाही. मात्र नागपूरचाच मुख्यमंत्री होणार याची चर्चा मात्र भाजपमध्ये जोरात आहे. जर असे झाले तर मंत्री म्हणून नव्या मंत्रिमंडळात नागपूरमधून कोणाला संधी मिळणार ? मंत्रीपद नागपूर शहराला मिळणार की ग्रामीणला ? याबाबत तर्क लावले जात आहेत.

Delhi Election Results 2025 news in marathi
दिल्लीतील भाजपच्या अभूतपूर्व यशाचे समीकरण; नीतीत बदल, सूक्ष्म व्यवस्थापन, मोदींचे नेतृत्व!
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
chief minister fadnavis criticized legislature for neglecting lawmaking and economic development tasks
विधीमंडळाच्या कामाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली नाराजी, म्हणाले…!
Legislative Council Chairman Ram Shinde testimony regarding the work of the society Pune news
मंत्री नसलो तरी सगळ्या मंत्र्यांकडून काम करून घेऊ; विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांची ग्वाही
revenue minister chandrashekhar bawankule on son law loan catering money Wardha
“जावयाचं कर्ज नको, हे घ्या जेवणाचे पैसे,” महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे असे का म्हणाले?
Kerala Politics
Kerala Politics : आगामी विधानसभेनंतर केरळच्या मुख्यमंत्री पदावर आययूएमएल दावा करणार? मित्रपक्ष काँग्रेसला दिला इशारा
Vacant posts of police officers in the maharashtra state
राज्यात पोलीस अधिकाऱ्यांची शेकडो पदे रिक्त; कायदा व सुव्यवस्था धोक्यात : तपासावरही परिणाम
Karnataka BJP leadership feud intensifies with anti-Yediyurappa camp proposing a new name for state unit chief.
“…तर कर्नाटकात दहा जागाही मिळणार नाहीत”, कर्नाटक भाजपामध्ये पेटला अंतर्गत वाद; प्रदेशाध्यक्षपदासाठी रस्सीखेच

२०१४ मध्ये फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा एक मंत्रिपद ग्रामीण भागाला देण्यात आले होते. कामठीतून विजयी झालेले चंद्रशेखर बावनकुळे यांना संधी मिळाली होती. ते पाच वर्षे पालकमंत्री होते. २०२४ मध्ये नागपूर जिल्ह्यातून भाजपचे १२ पैकी ८ उमेदवार निवडून आले. त्यात शहरातून चार आणि ग्रामीणमधील चार जणांचा समावेश आहे. फडणवीस सलग सहाव्यांदा, खोपडे , बावनकुळे चौथ्यांदा, समीर मेघे सलग तिसऱ्यांदा आणि मोहन मते, सलग दुसऱ्यांदा विजयी झाले. प्रवीण दटके, चरणसिंह ठाकूर प्रथमच विधानसभेवर निवडून आले. आशीष देशमुख २०१९ च्या खंडानंतर दुसऱ्यांदा विजयी झाले.

आणखी वाचा- ईव्हीएम विरोधात एकेकाळी रान उठविणारे चंद्राबाबू नायडू भाजपासह सत्तेत जाताच झाले शांत; भूमिकेत एवढा बदल कसा झाला?

मंत्रीपदासाठी ग्रामीण भागाचा विचार करता बावनकुळे सध्या प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे त्यांचा दावा प्रबळ ठरतो. त्याच प्रमाणे हिंगण्यातून समीर मेघे यांना मागच्या अडिच वर्षात संधी मिळाली नाही, त्यामुळे यावेळी ते दावा करू शकतात. फडणवीस, गडकरी यांचे समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे.त्यामुळे त्यांचीही दावेदारी प्रबळ ठरते. सावनेरमधून काँग्रेस नेते सुनील केदार यांचे वर्चस्व मोडीत काढून निवडून आलेले आशीष देशमुख यांना पक्ष कोणती जबाबदारी देते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. काटोलमधून चरणसिंह ठाकूर प्रथमच विधानसभेवर निवडून गेले आहेत.

आणखी वाचा-Constitution : “सत्तेत असलेल्या लोकांमध्ये हे गुण नसतील तर…”, संविधान सभेच्या शेवटी डॉ. राजेंद्र प्रसादांनी दोन गोष्टींवर व्यक्त

शहराचा विचार केल्यास कृष्णा खोपडे हे विदर्भातून सर्वाधिक मताधिक्याने म्हणजे एक लाखांहून अधिक मतांनी विजयी झाले. त्यांचा खुद्द फडणवीस आणि बावनकुळे यांनी सत्कार केला. लोकसभा निवडणुकीतही त्यांच्या पूर्व नागपूर मतदारसंघातून भाजप उमेदवार नितीन गडकरी यांना मोठे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे यावेळी शहरात एक मंत्रिपद द्यायचे झाल्यास त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. मोहन मते आणि प्रवीण दटके हे कट्टर फडणवीस समर्थक म्हणून ओळखले जातात. दोघांचीही कारकीर्द महापालिकेच्या राजकारणातून सुरू झाली असून त्यांना नागरी समस्यांची माहिती आहे. दटके माजी महापौर होते व सध्या ते विधान परिषदेचे सदस्य आहेत. मते आमदार होते व त्यांनीही स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषवले आहे. त्यामुळे आगामी नागपूर महापालिका निवडणुकीचा विचार केल्यास या दोन नावांपैकी एका नावाचा विचार पक्षाकडून होऊ शकतो.

Story img Loader