‘राज्यपाल रवी परत जा’ असे चेन्नईत जागोजागी लागलेले फलक, राज्यपालांना परत बोलवा म्हणून राष्ट्रपतींकडे तक्रार, विधानसभेत अभिभाषणात काही उतारे वगळल्यावर राज्यपालांनी वाचलेले नव्हे, तर सभागृहात वितरित केलेले भाषण अधिकृत समजावे म्हणून मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी मांडलेला ठराव या साऱ्या घडामोडींमुळे राज्यपाल विरुद्ध द्रमुक सरकार यांच्यातील वादात राज्यपाल रवी यांनी एक पाऊल मागे घेतले आहे.

तमिळनाडू नव्हे तर ‘तामिजगम’ असा उल्लेख राज्यपाल रवी यांनी अलीकडेच केला होता. तमिळनाडू हे नाव योग्य नाही, असा राज्यपालांचा युक्तिवाद होता. यावरून तमिळनाडूतील राजकारण तापले होते. द्रमुकने तर थेट राज्यपालांच्या विरोधात कडक भूमिका घेतली होती. तमिळनाडू याचा अर्थ तमिळांची भूमी असा होता. राज्यपालांनी तामिळांचा देश असा त्याचा अर्थ काढून तमिळनाडूऐवजी तामिजगम असे नाव सुचविले होते. भाजप वगळता सर्वच राजकीय पक्षांनी राज्यपालांच्या या भूमिकेच्या विरोधात मत मांडले होते.

cm Devendra fadnavis marathi news
Supriya Sule : राज्य सरकारवर खासदार सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप, म्हणाल्या…!
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Dhananjay Munde statement that resign if ordered by the party leader
पक्षनेतृत्वाने आदेश दिल्यास पदत्याग! धनंजय मुंडे यांची स्पष्टोक्ती
Dhananjay Munde Beed Guardian Minister
Dhananjay Munde: “मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा मागितला तर…”, दिल्लीमध्ये भेटीगाठी घेतल्यानंतर धनंजय मुंडे काय म्हणाले?
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Nitish Kumar and Chandrababu Naidu on UGC
यूजीसीच्या मसुद्यावरून एनडीएमध्ये अस्वस्थता; जेडीयूची स्पष्ट नाराजी, तर टीडीपी, लोजपकडून सावध पवित्रा
Sunil Tatkare On Raigad Guardian Minister
Sunil Tatkare : रायगडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय स्थगित केल्यानंतर सुनील तटकरेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “मुख्यमंत्री आल्यानंतर…”

हेही वाचा – “लोकसभा निवडणुकीसाठी ४०० दिवस बाकी, त्यामुळे मुस्लीम समाजापर्यंत…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कार्यकर्त्यांना आवाहन

सत्ताधारी द्रमुक आणि राज्यपालांमधील वाद वाढू लागला असतानाच राज्यपाल रवी यांनी एक प्रसिद्धी पत्रकाद्वारे तमिळनाडू हे नाव बदलण्याची कोणतीही योजना नसल्याचे स्पष्ट केले. तसेच आपण तामिजगम हा उल्लेख वेगळ्या संदर्भात केला होता, असा खुलासा राज्यपालांनी केला. तसेच या वादावर आता पडदा पाडत असल्याचे राज्यपालांनी जाहीर केले.

हेही वाचा – राहुल गांधी काश्मीरमध्ये पोहचण्यापूर्वीच काँग्रेसला झटका, प्रवक्त्या दीपिका पुष्कर नाथ यांची ‘या’ कारणामुळे पक्षाला सोडचिठ्ठी

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना सरकार आणि राज्यपालांमध्ये वाद निर्माण झाला असता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कायमच मवाळ भूमिका घेतली होती. याउलट तमिळनाडूत मुख्यमंत्री स्टॅलिन, पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तसेच केरळात मुख्यमंत्री विजयन यांनी वेळोवेळी राज्यपालांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत आपलीच बाजू प्रभावीपणे मांडली आहे.

Story img Loader