Chandrababu Naidu on EVM: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांचा दारूण पराभव झाल्यानंतर तीनही पक्षांकडून आता ईव्हीएमवर याचे खापर फोडण्यात येत आहे. मविआचे नेते ईव्हीएममध्ये कशी गडबड झाली याचे दाखल रोज देत आहेत. महायुतीने या आरोपांना तथ्यहीन म्हटले आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मविआचा मोठा विजय झाला होता, त्यावेळी एकाही नेत्याने ईव्हीएमवर शंका उपस्थित केली नव्हती; आताच त्यांना ईव्हीएममध्ये कशी काय गडबड दिसली? असा सवाल विचारला जात आहे. ईव्हीएमबाबत अशी बदलती भूमिका फक्त मविआच नाही, तर आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीही घेतली होती. २०१९ साली ईव्हीएम विरोधात देशभरातील विरोधी पक्षांना एकत्र आणून रान उठविणारे नायडू हे कालांतराने ईव्हीएमबद्दल मवाळ झाले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना प्रचंड बहुमत मिळाले. तसेच केंद्रातही त्यांचा पक्ष एनडीएचा प्रमुख घटक पक्ष बनला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा