महेश सरलष्कर

‘भारत जोडो’ यात्रेच्या अंतिम टप्प्यासाठी, जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसने पूर्वतयारी केली असून सुरक्षेच्या दृष्टीने तिथल्या प्रशासनाशीही संवाद साधण्यात आला आहे. काश्मीर खोऱ्यात ही यात्रा यशस्वी होणे काँग्रेससाठी महत्त्वाचे असले तरी, येथील यात्रेचा प्रवास निर्विघ्न होणे केंद्र सरकार व भाजपसाठी देखील राजकीय लाभाचे असल्याचे मानले जात आहे.

Separate compartment, senior citizens,
दोन वर्षात ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकलमध्ये स्वतंत्र डबा, एका मालडब्याचे ज्येष्ठांसाठीच्या डब्यात रूपांतर, रेल्वे प्रशासनाची उच्च न्यायालयाला माहिती
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Supreme Court orders submission of report on Mhada building developers mumbai
पुनर्विकासातील सामान्यांच्या ‘म्हाडा’ सदनिका अद्याप विकासकांकडेच? सर्वोच्च न्यायालयाकडूनही अहवाल सादर करण्याचे आदेश
Controversial statement case High Court orders Thane Magistrate in case against Jitendra Awhad
वादग्रस्त वक्तव्याचे प्रकरण: जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा नोंदवण्याच्या मागणीचा पुनर्विचार करा,उच्च न्यायालयाचे ठाणे न्यायदंडाधिकाऱ्यांना आदेश
construction houses mangroves, state government,
खारफुटीवर घरे बांधल्याच्या तक्रारीच्या तपासणीचे राज्य सरकारला आदेश
MPSC, autonomy MPSC, Interference MPSC, satej patil
‘एमपीएससी’च्या स्वायत्ततेत हस्तक्षेप?
Union Minister Of port and shipping approved wage hike of port and dock workers
बंदर, गोदी कामगारांना साडेआठ टक्के वेतनवाढ, केंद्रीय बंदर व जहाजमंत्र्यांची मंजुरी
west Bengal rapist death penalty marathi news
बलात्काऱ्यांना फाशीच्या शिक्षेची तरतूद – ममता बॅनर्जी; ‘लवकरच कायद्यात सुधारणा’

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो’ यात्रा पंजाबमधून जम्मू-काश्मीरमध्ये जाईल. ही यात्रा २० जानेवारी रोजी जम्मूमध्ये पोहोचणार असून ३० जानेवारी रोजी श्रीनगरमध्ये यात्रेची सांगता होईल. राहुल गांधी श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकावतील. मात्र, राजौरीतील सलग दोन दहशतवादी हल्ल्यांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे ‘भारत जोडो’ यात्रेच्या सुरक्षेसंदर्भात केंद्र सरकारला अधिक दक्ष राहावे लागत आहे.

हेही वाचा >>> महाविकास आघाडीतील जागावाटपासाठी अजित पवारांचा तोडगा

काश्मीर खोऱ्यातील यात्रेच्या सुरक्षेसंदर्भात पक्षाचे संघटना महासचिव के. सी. वेणुगोपाल व प्रभारी रजनी पाटील यांनी काही दिवसांपूर्वी श्रीनगरचा दौरा केला होता. या दौऱ्यामध्ये दोन्ही काँग्रेस नेत्यांनी नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांची भेट घेतली होती. ‘भारत जोडो’ यात्रा जम्मू-काश्मीरमध्ये कोणत्याही अडचणीविना पार पडेल. यात्रा यशस्वी होण्यासाठी जम्मू-काश्मीर प्रशासनाकडून सर्व साह्य़ केले जाईल, असे आश्वासन नायब राज्यपालांनी काँग्रेसला दिले असल्याचे समजते.

हेही वाचा >>> जनआक्रोश मोर्चातून मतांच्या धृवीकरणावर भाजपचा भर

गेल्या महिन्याच्या अखेरीस जम्मू-काश्मीरमधील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीमध्ये बैठक घेतली होती. गेल्या वर्षभरात दहशतवादी हल्ल्यांमध्ये काश्मिरी पंडितांनाही लक्ष्य बनवले गेल्यामुळे शहा यांनी ही बैठक बोलावली होती. जम्मू-काश्मीरमध्ये मतदारसंघांची फेररचना झाली असून विधानसभेची निवडणूकही होणार आहे. प्रामुख्याने काश्मीर खोऱ्यात राजकीय प्रक्रिया सुरू करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याचे केंद्र सरकारला अधोरेखित करायचे आहे. ‘भारत जोडो’ यात्रा काश्मीर खोऱ्यात यशस्वी होणे जितके काँग्रेससाठी लाभदायी असेल तितकेच किंबहुना काकणभर जास्त केंद्र सरकारसाठी असेल. त्यामुळे काश्मीर खोऱ्यात ही यात्रा यशस्वी करण्याची जबाबदारी काँग्रेसपेक्षा केंद्र सरकार व केंद्रशासित प्रदेशातील प्रशासनावर अधिक असेल’, असे काँग्रेसमधील नेत्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा >>> केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाला स्थान मिळणार का?

काश्मीरमध्ये ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान सुरक्षेसंदर्भातील समस्या निर्माण होऊ न देण्याची दक्षता प्रशासन घेईल, अशी ग्वाही काँग्रेसच्या नेत्यांना देण्यात आली आहे. मात्र, उर्वरित भारतामध्ये यात्रेमध्ये प्रचंड गर्दी होत होती व पदयात्रेमध्ये मोठ्या संख्येने लोकांना सहभागी झाले होते. यात्रेत सामील होण्यासाठी कोणालाही आडकाठी केली जात नव्हती. जम्मू-काश्मीरमध्ये मात्र राहुल गांधी व यात्रेला असलेला सुरक्षेचा धोका लक्षात घेऊन काही निर्बंध घातले जाऊ शकतात. २० ते ३० जानेवारी या दहा दिवसांच्या काळातील पदयात्रेमध्ये किती संख्येने लोकांना सहभागी होता येईल, दररोज किती किमी पदयात्रा करता येईल आदी महत्त्वाच्या मुद्द्यांचा प्रशासन विचार करत असल्याचे समजते. ‘ही यात्रा यशस्वी झाली तर, काश्मीर खोऱ्यातील वातावरण बदलत असून तिथे शांतता निर्माण होऊ लागली असल्याचा प्रचार केंद्र सरकार व भाजपला करता येईल’, अशी टिप्पणी काँग्रेसच्या नेत्यांनी केली.