पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी पक्ष असणाऱ्या तृणमूल काँग्रेसला त्रिपुरात मात्र अस्तित्व टिकविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. वाढती बंडखोरी आणि पक्षांतर्गत वाद यामुळे त्रिपुरात टीएमसी पोखरली गेली आहे. विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पक्षाला राज्यात अस्तित्व टिकवण्यासाठी लढावं लागणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. येत्या काही महिन्यांमध्ये त्रिपुरात विधानसभा निवडणुका होणे अपेक्षित आहे. त्या पार्श्वभूमीवर त्रिपुरात आता राजकीय घडामोडी घडण्यास सुरवात झाली आहे. त्रिपुरातील विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या सहा महिन्यांपूर्वी तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. येथील तृणमूल कॉंग्रेसचे नेते बाप्तू चक्रवर्ती यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी तृणमूल काँग्रेसची साथ सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.बाप्तू यांच्यासह मोठ्या गटाने पक्ष सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने मोठा धक्का बसला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा