मुंबई : गेल्या दोन-अडीच वर्षांपासून आम्ही न्यायमंदिराची दारे ठोठावत आहोत. हात दुखायला लागले आहेत. न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे, पण अजूनही न्याय मिळत नाही, अशी खंत व्यक्त करताना शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता जनतेच्या दरबारातील लढाई सुरू झाली असून त्या दरबारात न्याय मागणार असल्याचे सांगत महायुती सरकारवर टीका केली. राज्यात भ्रष्टाचार, महिला अत्याचार होत असून जनतेला त्राता उरला नसल्याने ‘मशाल हाती घे, सत्वर भू वरी ये’ या अराजकीय गाण्यातून आई जगदंबेला आम्ही साकडे घालत असल्याचे ठाकरे यांनी जाहीर केले.

हेही वाचा >>> Campaigning Ends In Haryana : हरियाणात निवडणूक प्रचाराची सांगता

Justice Gawai over Laddu case
Tirupati Laddu Row : “जेवणात लाडू नसतील अशी आशा आहे”… जेव्हा सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीशही हास्यविनोद करतात!
2nd October Rashi Bhavishya & Panchang
२ ऑक्टोबर पंचांग: सर्वपित्री अमावस्या कोणासाठी ठरणार शुभ?…
yuvasena s dipesh mhatre
कडोंमपाच्या नाममुद्रेचा दिपेश म्हात्रेंनी गैरवापर केल्याची भाजपची आयुक्त डॉ. जाखड यांच्याकडे तक्रार; कायदेशीर कारवाईची मागणी
ujjwal nikam on akshay shinde encounter
“या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी नक्कीच होईल, कारण…”; अक्षय शिंदेच्या मृत्यूप्रकरणी उज्वल निकम यांची प्रतिक्रिया!
Dhananjay Chandrachud
D Y Chandrachud : “…तर मी तुम्हाला हाकलून देईन”, सरन्यायाधीशांनी ममता बॅनर्जींच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्याला सुनावलं
Giving judgments that government does not like enhances image of court says Justice Abhay Oak
वेळप्रसंगी सरकारला नावडते निर्णय दिल्याने न्यायालयाची प्रतिमा उंचावते : न्या. अभय ओकांचे स्पष्ट प्रतिपादन
Anyone embezzling in Anand Dighe's ashram should be thoroughly investigated
आनंद दिघेंच्या आश्रमात ज्यांनी चुकीचे कृत्य केले त्यांना……शिंदे सेनेच्या मंत्र्याने थेटच सांगितले…
Controversial statement case High Court orders Thane Magistrate in case against Jitendra Awhad
वादग्रस्त वक्तव्याचे प्रकरण: जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा नोंदवण्याच्या मागणीचा पुनर्विचार करा,उच्च न्यायालयाचे ठाणे न्यायदंडाधिकाऱ्यांना आदेश

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत श्रीरंग गोडबोले यांनी लिहिलेल्या आणि नंदेश उमप यांनी गायलेल्या ‘असुरांचा संहार कराया मशाल हाती दे, सत्वर भू वरी ये गं सत्वर भूवरी ये’, या गीताचे अनावरण करण्यात आले.

दसरा मेळाव्यात आरोपांना उत्तर!

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या टीकेबाबत विचारले असता, सध्या आमच्या विरोधात जे कोणी बोलत आहेत त्यांना बोलू द्यात. या सगळ्याचा फडशा मी शिवाजीपार्कवरील दसरा मेळाव्यात पाडणारच असून ‘सो सोनार की, एक लोहार की’ असा दणका देणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.