मुंबई: लोकसभा निवडणुकीत ‘मला नकली म्हणणारे बेअकली’ अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट टीका करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव व ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला फारसे महत्व न देता भाजपच्या प्रमुख नेत्यांवर जहरी टीका करण्याची रणनिती आखली आहे. त्याची चुणूक मुंबई व पुण्यातील दोन सभेत दिसून आली.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाने ‘चला जिंकूया’ विधानसभा अभियानाअंर्तगत शिवसंकल्प यात्रा सुरु केली आहे. निवडणुकीपूर्वी दोन तीन महिने अगोदर सुरु करण्यात आलेल्या संर्पकयात्रांचा फायदा ठाकरे यांना लोकसभा निवडणुकीत झाला. हेच तंत्र कायम ठेवून ठाकरे यांनी २७ जुलैच्या वाढदिवसानंतर शिवसंकल्प यात्रा सुरु केली आहे. त्याअगोदर सर्व संर्पकप्रमुखांना प्रत्यके जिल्हा, तालुका, आणि पंचायत पिंजून काढण्याचा सल्ला दिला आहे. ही विधानसभा निवडणूक ठाकरे यांच्या अस्तित्वासाठी फार महत्वाची आहे. लोकसभा निवडणुकीत काही पराजय ठाकरे यांच्या जिव्हारी लागले आहेत. यात ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, या पराभवांचा समावेश आहे. या लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचे ठाकरे यांचे लक्ष आहे. मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या सभेत त्यांनी फडणवीस यांना निर्वाणीचा इशारा दिला. शिवसेना भाजप युती काळात ‘सख्ये मित्र’ असलेले ठाकरे फडणवीस आता ‘पक्के वैरी’ झाले आहेत. मित्र शत्रू झाल्यानंतर तो इरेला पेटत असल्याची अनेक उदाहरणे भारतीय राजकारणात आहेत. निवडणुकीनंतर ‘एकतर तू राहशील नाहीतर मी राहीन’ असा निर्वाणीचा इशारा ठाकरे यांनी फडणवीस यांना दिला. या टीकेला ‘ठाकरे यांचे डोके फिरलय’ असे उत्तर देऊन फडणवीस यांनी ही टीका फारशी मनावर घेतली नाही.

Arvind Kejriwal resign today
केजरीवाल यांचा आज राजीनामा? राज्यपालांकडे भेटीसाठी वेळ मागितली
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Vijay Wadettiwar, Congress, Vijay Wadettiwar news,
वडेट्टीवारांना घेरण्याचे काँग्रेसमधूनच प्रयत्न सुरू
Amit Shah on article 370
जम्मू-काश्मीरच्या निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करताना अमित शाह यांचं कलम ३७० बाबत मोठं विधान; म्हणाले…
नरेश म्हस्के यांच्या खासदारकीला आव्हानाचे प्रकरण, मतदान यंत्र परत मिळविण्यासाठी निवडणूक आयोग उच्च न्यायालयात
Man Khatav Constituency Prabhakar Deshmukh vs MLA Jayakumar Gore MArathi News
कारण राजकारण: विश्वासार्हता, आमदारकी टिकवण्याचे जयकुमार गोरे यांच्यापुढे आव्हान
Extension of time to Ravindra Waikar to clarify his position on Amol Kirtikar petition print politics news
कीर्तिकरांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्यासाठी वायकर यांना मुदतवाढ
Supriya Sule, Baramati Assembly, Supriya Sule on Baramati Assembly, candidate, Ajit Pawar, Jay Pawar , Yugendra Pawar, NCP, Sharad Pawar
बारामती विधानसभा उमेदवाराबद्दल खासदार सुप्रिया सुळेंचे मोठे वक्तव्य !

हेही वाचा – कारण राजकारण: धार्मिक ध्रुवीकरण साटम यांना बाधणार?

हेही वाचा – भाजपकडून वाझेंच्या ‘कुबड्या’ घेत आरोपांचे सत्र; अनिल देशमुख यांची टीका

पुण्यातील सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही दिवसांपूर्वी ठाकरे पवार यांच्यावर सडकून टीका केली होती. अमित शहा हे तर देशावर आक्रमण करणाऱ्या अहमद अब्दालीचे वंशज असल्याचे म्हटले आहे. राज्यातील भाजप नेते या टीकेला उत्तर देत आहेत. दोन्ही शिवसंकल्प सभांमध्ये ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जहरी टीका टाळली आहे. पक्ष फोडण्याचे शिंदे यांनी केलेले धाडस हे भाजपच्या पाठिंब्याशिवाय शक्य नाही हे जगजाहीर आहे. त्यामुळे शिंदे, अजित पवार यांना लक्ष्य न करता मोदी, शहा, फडणवीस या भाजप नेत्यांवर टीका करीत आहेत. या नेत्यांवर बोचरी टीका केल्यास त्याची सर्व पातळीवर दखल घेतली जात असल्याचे गणित ठाकरे यांच्या लक्षात आले आहे. त्यासाठी ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत या नेत्यांवर जहरी टीका करण्याची व्यूहरचना आखली आहे.