गाझीपूरचे विद्यमान खासदार आणि दिवंगत राजकीय नेते मुख्तार अन्सारी यांचे भाऊ अफजल अन्सारी यांनी सध्या लोकसभा मतदारसंघात जोरदार प्रचार केला आहे. अन्सारी यांना भाजपाचे पारसनाथ राय यांच्या विरोधात उभे केले आहे, जे जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते मनोज सिन्हा यांच्या जवळचे मानले जातात. याच पार्श्वभूमीवर अफझल अन्सारी यांनी विशेष मुलाखत दिली असून, अनेक मुद्द्यावर दिलखुलास उत्तरे दिली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुम्ही प्रचाराच्या मध्यावर होतात, कोणते मुद्दे चर्चेत होते?

प्रचारात जे मुद्दे चर्चेत आले आहेत, ते खरं तर जनतेचे मुद्दे आहेत. सर्वात मोठे प्रश्न म्हणजे बेरोजगारी, महागाई आणि विद्यमान भ्रष्टाचार आहे. सरकार आपल्या साधनसंपत्तीचा गैरवापर करीत असून, भीती आणि दहशतीच्या जोरावर मते मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे. दुसरा मुद्दा सरकारच्या लालसेचा आहे. बेरोजगारांची संख्या मोठी आहे. कोणत्याही प्रकारचे काम मिळविण्यासाठी कोणतेही साधन नाही. जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षणासाठी व्याजावर कर्ज मिळते, तेव्हा त्याला नोकरी मिळत नाही आणि व्याज वाढतच जाते. सरकारचे कर्तृत्व म्हणून मार्गी लागलेली कामे म्हणजे विरोधकांना तुरुंगात टाकणे, त्यांच्या घरावर बुलडोझर फिरवणे अशा गोष्टी आहेत. एका विशिष्ट विचारसरणीचे पालन करणाऱ्या समाजातील १० टक्के लोकांना या गोष्टी आवडतात. पण त्यात सर्वसामान्य जनता खूश असल्याचे दाखवले आहे. न्यायालये का अस्तित्वात आहेत यावर लोक चर्चा करीत आहेत. जनतेला समजले आहे की, योगी आदित्यनाथ त्यांचे खटले कधीही कोर्टात चालू देणार नाहीत. तुम्ही भाजपा नेते मनोज सिन्हा हे विकासपुरुष आहेत, असे म्हणाल का? निवडणुकीत त्यांचा सुमारे १.२५ लाख मतांनी पराभव झाला आणि तरीही त्यांना जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर बनवण्यात आले.

मुख्तार अन्सारीच्या मृत्यूनंतर (मार्चमध्ये) तुम्ही म्हणाला होतात की, इथल्या लोकांमध्ये खूप संताप आहे. त्याचा निवडणुकीवर परिणाम होणार आहे का?

मुख्तार अन्सारीच्या मृत्यूबद्दल लोकांचे काय मत आणि भावना आहेत हे ४ जूनला स्पष्ट होणार आहे.

हेही वाचाः मोदींनी लोकसभा निवडणुकीचे ग्रामपंचायत निवडणुकीत रुपांतर केले अन् लक्ष्मणरेषा पार केली : प्रकाश आंबेडकर

इथल्या जाहीर सभांना कसा प्रतिसाद मिळतो?

निवडणुकीच्या सभांना मुख्यमंत्री येत आहेत आणि मोठे नेते येत आहेत. एका गावातल्या छोट्या सभेत माझ्यापेक्षा जास्त लोक असतात. ही निवडणूक जनता लढवत आहे.

समाजवादी पक्षाने चार मुस्लिम उमेदवार उभे केले असून, त्यापैकी तुम्ही एक आहात.

तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारले पाहिजे की, जगातील सर्वात मोठ्या पक्षाने मुस्लिमांना किती तिकिटे दिली आहेत. समाजातील दुर्बल जसे की, दलित, ओबीसी आणि पुढील जाती समाजाच्या तळाशी आहेत. त्यांना वास्तव समजले आहे. खोट्याचा डोंगर किती दिवस उभा राहणार आहे. २०० जागा मिळवण्यासाठी ते संघर्ष करतील.

हेही वाचाः ‘लक्ष्मी भंडार योजने’वरुन तृणमूल काँग्रेस आणि भाजपामध्ये का जुंपली आहे?

तुम्ही २०१९ ची निवडणूक बसपाच्या तिकिटावर लढवली होती. आताचा पक्ष हा विरोधी आघाडीचा भाग नसल्याची खंत आहे का?

मला लोकांच्या समस्यांबद्दल बोलायचे आहे आणि यामुळे लोकांची चिंता नाही. मला पेपर लीकबद्दल बोलायचे आहे, ज्याचा परिणाम उत्तर प्रदेशातील सर्व तरुणांवर झाला आहे. त्यांनी फॉर्म भरून त्यावर पैसे खर्च केलेत. त्या पैशाने सरकारने आपले बँक खाते भरले आणि मग पेपर फुटले. सध्याच्या सरकारकडून सर्वसामान्यांना काहीच मिळालेले नाही.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unemployment inflation and corruption are the biggest problems the common man has got nothing from the present government says criticism of afzal ansari vrd