कधीकाळी भाजपाचा एनडीएमधील सहकारी पक्ष असलेला आणि पंजाबमध्ये ज्यांनी अनेक वर्ष सत्ता सांभाळली त्या शिरोमणी अकाली दल (SAD) पक्षानेही समान नागरी संहितेचा (UCC) विरोध केला आहे. २२ व्या विधी आयोगाला अधिकृतरित्या निवेदन देऊन अकाली दलाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कोणताही मोठा निर्णय घेत असताना शीख समुदायाच्या भावनांचा विचार केला जावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. अकाली दलाने शुक्रवारी (दि. १४ जुलै) विधी आयोगाला निवेदन दिले. त्यात त्यांनी म्हटले, “समाजातील विविध भागधारकांच्या सूचना घेतल्या जाव्यात, मग ते राज्यातील असोत किंवा राज्याबाहेरचे. आम्ही समान नागरी संहितेबाबत समाजाचा कानोसा घेतला. तेव्हा आमच्या लक्षात आले की, समान नागरी संहिता लागू केल्यास विविध जाती, पंथ आणि अल्पसंख्याक धर्माच्या समुदायातील लोकांच्या स्वातंत्र्यावर निश्चितपणे परिणाम होईल”
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा