उत्तर प्रदेशमध्ये आजपासून (१९ सप्टेंबर) पाच दिवसीय पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. येत्या २३ सप्टेंबरपर्यंत येथे राज्यातील वेगवेगळ्या प्रश्नांवर सखोल चर्चा केली जाईल. दरम्यान, या अधिवेशनात २२ डिसेंबर हा दिवस फक्त महिला आमदारांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. या राखीव दिवसामध्ये सर्वपक्षीय महिला आमदारांना वेगवेगळ्या मुद्द्यांवर बोलण्यास संधी दिली जाणार आहे.

हेही वाचा >>> हिमाचल प्रदेश : ‘देशाचे तुकडे होतील म्हणणाऱ्यांसोबतच काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा,’ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्मृती इराणींची टीका

droupadi murmu
Droupadi Murmu : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू महाकुंभमेळ्याला देणार भेट; ‘असा’ असेल नियोजित दौरा
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
valentines day chaturang article
नात्यांची नवी वळणदार वळणे
chairperson vijaya rahatkar announces countrys first premarital counseling Centre opening in Nashik
नाशिकमध्ये महिलादिनी देशातील पहिले विवाहपूर्व समुपदेशन केंद्र, कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी पुढचं पाऊल
tourism mahabaleshwar news in marathi
महाबळेश्वरला २६ ते २८ एप्रिल पर्यटन महोत्सवाचे आयोजन, शंभूराज देसाई यांची माहिती
What happens when you drink Clove lemon tea every day health news
दररोज एक कप लिंबू-लवंगयुक्त चहाचे सेवन करा अन् शरीरातील ‘हे’ बदल पाहा; तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल
What Narendra Modi Said?
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य, “नेहरू-इंदिरा गांधींपासून काँग्रेसच्या सरकारांमध्ये १२ लाखांवर ३ लाखांचा कर…”
gajlakshmi
२६ जुलैपासून ‘या’ ३ राशींवर होईल माता लक्ष्मीची कृपा! शुक्र-गुरुच्या युतीमुळे निर्माण होईल ‘गजलक्ष्मी राजयोग’, चांगले दिवस येणार

मागील काही दिवसांपासून उत्तर प्रदेश सरकारवर कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर सडकून टीका केली जात आहे. लखीमपूर खेरी येथे दोन दलित बहिणींवरील बलात्कार आणि हत्येच्या घटनेमुळे येथील सरकार आधीच अडचणीत आलेले आहे. हाच मुद्दा घेऊन सध्याच्या पावसाळी अधिवेशनात सरकारला घेरण्याची रणनीती विरोधकांकडून आखली जात होती. असे असताना महिलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अधिवेशनादरम्यान २२ सप्टेंबर हा दिवस महिला आमदारांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्पावर राज ठाकरेंचे महत्त्वाचे विधान, म्हणाले “कोणी पैसे मागितले…”

पावसाळी अधिवेशनातील २२ सप्टेंबर या दिवशी आम्ही महिला आमदारांना बोलण्याची संधी देणार आहोत. आतापर्यंत देशातील कोणत्याही राज्याने हा निर्णय घेतलेला नाही. २२ सप्टेंबर रोजी प्रश्नोत्तराच्या तासानंतर महिला आमदारांना त्यांचे मुद्दे मांडण्यासाठी वेळ राखीव ठेवण्यात येणार आहे, असे बिहार विधानसभेचे अध्यक्ष सतीश महाना यांनी रविवारी पत्रकारांना सांगितले.

हेही वाचा >>> नगरविकासमंत्री होतो तरी तेव्हा अधिकारच नव्हते …मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना चिमटा

मी काही दिवसांपूर्वी महिला आमदारांशी चर्चा केली आणि त्यांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पुरूष आमदार बोलतात तेव्हा महिला आमदार पूर्ण क्षमतेने त्यांचा मुद्दा विधानसभेत मांडू शकत नाहीत, असे मला समजले. त्यानंतर महिला आमदारांना चर्चा करता यावी म्हणून एक दिवस राखीव ठेवला जाईल, असे मी त्यांना सांगितले, अशी माहिती महाना यांनी दिली.

हेही वाचा >>> विश्लेषण : तमिळनाडूची न्याहारी योजना काय आहे?

दरम्यान, उत्तर प्रदेशच्या विधानसभेतील ४०३ आमदारांमध्ये फक्त ४७ महिला आमदार आहेत. यात २२ आमदार पहिल्यांदाच आमदार म्हणून विधानसभेवर गेलेल्या आहेत.

Story img Loader