लोकसभेची आगामी निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली असून त्या दृष्टीने देशातील सर्वच पक्षांनी आपापल्या स्तरावर तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधक केंद्रीय पातळीवर ‘इंडिया आघाडी’च्या रुपात एकत्र आले आहेत. या आघाडीत काँग्रेस, समाजवादी पार्टी, राष्ट्रवादी, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी यासारख्या महत्त्वाच्या पक्षांचा समावेश आहे. राष्ट्रीय पातळीवर विरोधकांनी इंडिया आघाडी केली असली तरी राज्य पातळीवर वेगवेगळ्या पक्षांतील मतभेद अद्याप कायम आहेत. याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश काँग्रेसने वेगळी भूमिका घेतली आहे. या राज्यात अन्य कोणत्याही पक्षाशी युती करू नये, अशी मागणी या राज्यातील स्थानिक नेत्यांनी केली. तसेच आगामी काळात गांधी परिवारातील एखाद्या सदस्याने उत्तर प्रदेशमध्ये पदयात्रेचे आयोजन करावे, अशीही इच्छा व्यक्त केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा