राजस्थानच्या जयपूर शहरात पितांबर पेठ येथे भविष्यकाळातील पंडित घडविण्यासाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. ज्या प्रकारे वसतिगृहात राहून मुले क्रमिक शिक्षण घेतात. त्याप्रमाणे पितांबर पेठमध्ये वैदिक शिक्षणाचे धडे देऊन उद्याचे पुजारी, पंडित घडविण्याचे काम सुरू आहे. राजस्थानचे हे २६ वे सरकारमान्य वेद विद्यालय आहे. सनातन धर्माचे रक्षण करण्यासाठी १० ते १७ वयोगटांतील मुलांना पाच वर्षांचा कोर्स या विद्यालयात शिकविण्यात येतो. प्राचीन धर्मग्रंथ, मंत्रोच्चार याचे शिक्षण येथे देण्यात येते, अशी माहिती येतील शिक्षकांनी दिली. वैदिक शिक्षण घेत असताना या मुलांना शाळेत जाऊन क्रमिक शिक्षणही घ्यावे लागते. काँग्रेसची हिंदू विरोधी असलेली प्रतिमा मोडून काढण्यासाठी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी गेल्या काही वर्षांपासून वेद विद्यालयांवर लक्ष केंद्रित केले असून त्याच्या विकासासाठी राज्य अर्थसंकल्पात तरतूददेखील केलेली आहे. ‘द प्रिंट’ या संकेतस्थळाने जयपूरस्थित पितांबर पेठमधील ‘श्री गुरु कृपा वेद विद्यालया’ला भेट दिली असून याबद्दलची सविस्तर माहिती प्रकाशित केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा