लोकसभा निवडणुकीपूर्वीच देशात जोरदार राजकारण रंगू लागले आहे. प्रभू राम आणि राम मंदिराला निवडणुकीचा मुद्दा बनवण्याचे नेते एकही संधी सोडत नाही आहेत. द्रमुक नेते ए. राजा यांनी भगवान राम आणि राम मंदिरासंदर्भात आक्षेपार्ह विधाने केली असतानाच एकेकाळी भाजपामध्ये असलेले टीएमसी खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनीही भाजपाचा राम मंदिराचा मुद्दा हवेत उडाल्याचा दावा केलाय. दुसरीकडे मध्य प्रदेशात भारत जोडो न्याय यात्रेवर असलेले राहुल गांधी म्हणाले की, ‘मोदीजींची इच्छा आहे की, देशातील तरुणांनी दिवसभर मोबाइल फोन वापरावा, जयश्री रामचा जप करावा आणि उपाशी मरावे.’ त्यामुळे यावर भाजपाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ”राजा म्हणाले की, मी जय श्रीराम आणि भारत माता की जय कधीही स्वीकारणार नाही. सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका आणि मल्लिकार्जुन खरगे हे सगळे ए राजा यांच्याशी सहमत आहेत का?” असा सवालही भाजपा खासदार रविशंकर प्रसाद यांनी उपस्थित केला आहे. पुढे त्यांनी असा प्रश्न उपस्थित केला की, द्रमुकने इतर कोणत्याही धर्माविरोधात अशी टिप्पणी करावी का? ते म्हणाले की, आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो. याबरोबरच त्यांनी इंडिया आघाडीबाबतही प्रश्न उपस्थित केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा