२०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधक एकत्र आले आहेत. त्यांनी आपल्या आघाडीला ‘इंडिया’ असे नाव दिले आहे. मात्र भाजपाकडून इंडिया या नावाचा उल्लेख टाळण्याचा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपाचे नेते ठिकठिकाणी देशाचे नाव घेताना इंडिया हे नाव वापरण्याचे टाळत आहेत. त्याऐवजी देशाचे नाव घेताना ते भारत हा शब्द वापरत आहेत. जी-२० शिखर परिषदेनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या आमंत्रण पत्रिकेवर ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ ऐवजी ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असे लिहिलेले होते. याच कारणामुळे मोदी सरकार लवकरच देशाच्या नाव फक्त भारत असे करणार असल्याची चर्चा रंगली आहे. असे असतानाच आता भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने देशाचे नाव भारत केले जाणार असून ज्या लोकांना हे नाव आवडलेले नाही, ते देश सोडून जाऊ शकतात, असे विधान केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा