“निवडणुकीचा काळ म्हणजे आमच्यासाठी घर सोडण्याचा आणि सुरक्षित ठिकाणी जाऊन राहण्याचा काळ असतो”, असे भाजपा कार्यकर्ते प्रशांत हलदर (३८) यांनी म्हटले आहे. पश्चिम बंगालमधील बारुईपूर शहरातील भाजपा कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या डझनभर बेडपैकी एका बेडवर ते बसले होते. प्रशांत हलदर हे जादवपूर लोकसभा मतदारसंघातील बारुईपूरमधील भाजपाचे कार्यकर्ते आहेत. १ जून रोजी मतदान केल्यानंतर आपल्या पत्नी आणि मुलांसह त्यांनी घर सोडले आहे. पत्नी आणि मुलाला एका नातेवाईकांच्या घरी सोडून ते भाजपाच्या कार्यालयात आसरा घेत आहेत. त्यांच्यासारखीच परिस्थिती असणारे आणखी ५० जण पक्षाच्या कार्यालयात आसरा घेत आहेत. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर हिंसाचार होण्याचा इतिहास आहे. त्या पार्श्वभूमीवर, निवडणुकीनंतर भाजपाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी घर आणि गाव सोडून सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला असल्याचे चित्र आहे. मात्र, हे पहिल्यांदाच असे घडते आहे असे नाही. याआधीही २०२१ च्या विधानसभा निवडणुकीनंतर तसेच २०२३ च्या पंचायत स्तरावरील निवडणुकीवेळीही हीच परिस्थिती भाजपा कार्यकर्त्यांवर ओढावली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा