नागपूर : इतर मागासवर्गीयांमधून मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी आग्रही असणारे मराठा आंदोलनातील नेते मनोज जरांगे पाटील यांचा राज्यातील महायुती सरकारबरोबर संघर्ष सुरू असला तरी त्यांचा सर्वाधिक राग भारतीय जनता पक्षावर आहे. युतीतील इतर घटक पक्षांच्या नेत्यांबाबत ते सौम्य भूमिका घेत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सरकारवर टीका करताना ते फक्त भाजप व पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनाच लक्ष्य करतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना त्यांची टीका सौम्य स्वरूपाची असते, असे अनेक वेळा दिसून आले आहे. हे दोन्ही नेते सरकारचेच घटक असतानाही जरांगेंची भूमिका वेगळी का, असा सवाल केला जात आहे.

bjp leader harshvardhan patil marathi news
हर्षवर्धन पाटील यांची महायुतीतील नेत्यांवर नाराजी, इंदापूरमधून निवडणूक लढविण्यावर ठाम; लवकरच निर्णय
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
bjp bihar pattern in Maharashtra
‘बिहार पॅटर्न’ला बगल? संघ सक्रिय झाल्यामुळे भाजप श्रेष्ठींच्या मनसुब्यांवर प्रश्नचिन्ह
Tanaji Sawant
Tanaji Sawant : “औकातीत राहून बोलायचं”, मंत्री तानाजी सावंतांचा शेतकऱ्यांना दम; म्हणाले, “सुपारी घेऊन मला…”
BJP,NCP,SHIV SENA,mahayuti
Prithviraj Chavan : “महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या हालचाली, कारण..”, माजी मुख्यमंत्र्यांचा दावा
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
What Devendra Fadnavis Said About Uddhav Thackeray?
Devendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंची मला खरंच दया येते, त्यांना लाचारासारखं…”; देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका
Narendra modi on Surat Loot
Surat Loot : सूरतेची महाराजांची लूट आणि मोदींचे १० वर्षांपूर्वीचे उद्गार… नक्की ऐका

हेही वाचा : RSS Annual Meeting: संघाची गरज नाही म्हणणारे जेपी नड्डा RSS च्या बैठकीला उपस्थित राहणार; ‘हे’ आहेत महत्त्वाचे मुद्दे

केंद्रात आणि राज्यात भाजपचेच सरकार आहे. त्यांनी ठरवले तर मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो. राज्यातील महायुती सरकारमध्ये भाजपच मुख्य भूमिकेत आहे. त्यामुळे जरांगे पाटील भाजपला लक्ष्य करतात. त्यात गैर काहीही नाही.

प्रकाश खंडागळे, सकल मराठा समाज

देवेंद्र फडणवीस किंवा छगन भुजबळ म्हणजे सरकार नव्हे. जरांगे यांनी सरकारवर टीका करायला हवी. उठसूठ आंदोलन करून समाज वेठीस धरू नये.

बबनराव तायवाडे, अध्यक्ष, राष्ट्रीय ओबीसी महासंघ

हेही वाचा : जे.पी. नड्डा यांच्याकडून कंगना यांची कानउघाडणी

जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा हात आहे. त्यांच्या इशाऱ्यावरच ते भाजपला लक्ष्य करीत आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आलेल्या महाविकास आघाडीला न्यायालयात हा निर्णय टिकवता आला नाही.

सुधाकर कोहळे, अध्यक्ष, भाजप, नागपूर जिल्हा