गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांची भेट झाली. ही भेट दोन आयुक्तांच्या नियुक्तीसंदर्भात असली तरी या भेटीला काही नेत्यांकडून राजकीय रंग देण्यात आला. त्यानंतर नितीश कुमार परत आरजेडीबरोबर युती करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत की काय? अशी जोरदार चर्चाही बिहारच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली. अखेर मुख्यमंत्री नितीश कुमार यांना माध्यमांसमोर येऊन त्याबाबत स्पष्टीकरण द्यावं लागलं.

माध्यमांशी बोलताना, जेडीयू एनडीएबरोबर आहे आणि भविष्यातही आम्ही एनडीएबरोबरच राहू. पुन्हा आरजेडीबरोबर युती करण्याचा आमचा कोणताही विचार नाही, अशी प्रतिक्रिया नितीश कुमार यांनी दिली. पुढे बोलताना, जी चुकी आम्ही काही वर्षांपूर्वी केली, ती चुकी आम्ही परत करणार नाही, असेही ते म्हणाले. विशेष म्हणजे त्यांची ही प्रतिक्रिया भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या भेटीनंतर आल्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं.

LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
bjp bihar pattern in Maharashtra
‘बिहार पॅटर्न’ला बगल? संघ सक्रिय झाल्यामुळे भाजप श्रेष्ठींच्या मनसुब्यांवर प्रश्नचिन्ह
Narendra modi on Surat Loot
Surat Loot : सूरतेची महाराजांची लूट आणि मोदींचे १० वर्षांपूर्वीचे उद्गार… नक्की ऐका
oil and gas reserves found in the sea of ​​Pakistan how equation can change for Pakistan
पाकिस्तानच्या समुद्रात आढळला प्रचंड खनिज तेलसाठा? उत्खननाची क्षमता किती? उद्ध्वस्त अर्थव्यवस्थेची भाग्यरेखा बदलेल?
Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
chavadi discussion with ncp leader sharad pawar about kolhapur maharashtra politics
चावडी : कोण सुक्काळीचा चाललाय तो!

हेही वाचा – RSS सरकार्यवाह होसबळेंची वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्याशी भेट, पूरम उत्सवात गोंधळ आणि भाजपाचा विजय – काँग्रेसचा गंभीर आरोप!

मुळात आपण एनडीएबरोबर आहोत, याबाबत स्पष्टीकरण देण्याची वेळ जेडीयूवर यावी, हे पहिल्यांदाच घडलेलं नाही. यापूर्वी जून महिन्यात लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तेजस्वी यादव आणि नितीश कुमार यांनी एकाच विमानातून प्रवास केल्याचा व्हिडीओ पुढे आला होता. तेव्हाही नितीश कुमारांच्या एनडीएबरोबर राहण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं. अखेर जेडीयूला माध्यमांसमोर येऊन त्याबाबत स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं.

खरं तर अशा प्रकारे वारंवार स्पष्टीकरण देणं आणि त्याद्वारे विरोधकांना गोंधळात ठेवणं, हा नितीश कुमारांच्या राजकारणाचा भाग असल्याचं बोललं जातं. ज्यावेळी ते महागठबंधनमध्ये होते, त्यावेळी त्यांनी अनेकदा भाजपाच्या नेत्यांची भेट घेत चर्चेचे मार्ग खुले ठेवले होते. तसेच २०१७ ते २०२२ या काळात एनडीएमध्ये असताना त्यांनी आरजेडीच्या नेत्यांशीही संपर्क ठेवला होता.

हेही वाचा – Haryana Election 2024: भाजपाकडून हरियाणात घराणेशाही पॅटर्न; आठ उमेदवारांचा राजकीय वारसा

दरम्यान, नितीश कुमार यांच्या स्पष्टीकरणानंतर भाजपाच्या नेत्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. ‘दी इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना, जेडीयूच्या एनडीएत येण्यामुळे भाजपाला रणनीतीत बदल करावा लागेल, असं ते म्हणाले. पुढे बोलताना, आगामी विधासभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सम्राट चौधरी यांना प्रदेशाध्यक्ष करण्यासंदर्भात पक्ष विचार करीत असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच भाजपाने रणनीती बदलली असली तरी आगामी निवडणूक नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालीच लढू, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

महत्त्वाची बाब म्हणजे आगामी निवडणुकीत आता बिहारमध्ये प्रशांत किशोर यांचा जनसुराज्य पक्षही निवडणूक लढविणार आहे. त्यामुळे बिहारमधील सध्याची राजकीय समीकरणं बघता, भाजपाकडे नितीश कुमार यांना आपल्याबरोबर ठेवण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. पण, २०२५ च्या निवडणुकीपूर्वी नितीश कुमार एनडीएबरोबर राहतील की नाही, याबाबत भाजपा नेत्यांच्या मनात शंका आहे.