पुणे : मोसमी वाऱ्याचा मागील दोन दिवसांपासून जोर वाढला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्यामुळे १९ ते २२ जुलै या काळात राज्यात सर्वदूर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मोसमी वाऱ्याचा जोर वाढला आहे. त्यामुळे बाष्पांनी भरलेले ढग पश्चिम घाट ओलांडून पुढे जातील. याच काळात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्यामुळे १९ ते २२ जुलै या काळात राज्यात सर्वदूर चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे. किनारपट्टीवर मुसळधार, तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.

monsoon withdrawal from maharashtra on 15 october still raining in various
विश्लेषण: मान्सून माघारी फिरल्यानंतरही पाऊस का पडतोय?
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
Analysis of Rainfall Data in sangli district
सांगली जिल्ह्यात सरासरीच्या दीडपटीहून अधिक पाऊस; खरीप संकटात तर रब्बी लांबणीवर
Northeast Monsoon active in South,
मोसमी पावसाची देशातून माघार, दक्षिणेत ईशान्य मोसमी पाऊस सक्रिय
rain prediction, in some parts of maharashtra,
राज्यात परतीचा पाऊस परत, “या” जिल्ह्यांना इशारा
Low Pressure Area Arabian Sea
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र; जाणून घ्या किनारपट्टी, पश्चिम घाटासाठीचा अंदाज
Weather experts predict the possibility of return of rain across the state pune news
बुधवारपासून राज्यभरात परतीचा पाऊस ? जाणून घ्या, हवामान तज्ज्ञांचा अंदाज
monsoon has been satisfactory across the country in 2024 Maharashtra also received 26 percent more rain than average
देशभरात यंदाचा पावसाळा ठरला समाधानकारक… महाराष्ट्रातही भरपूर पाऊस… एल निनो, ला निना निष्क्रिय?

किनारपट्टीला ‘ऑरेंज अ‍ॅलर्ट’

हवामान विभागाने १७ जुलै रोजी रत्नागिरी, रायगड जिल्ह्याला आणि १८ जुलै रोजी रत्नागिरी, रायगड आणि पुणे जिल्ह्याला ‘ऑरेंज अ‍ॅलर्ट’ दिला आहे. या काळात बहुतेक ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. घाट परिसरात जोरदार पावसाची शक्यता आहे.

कुलाब्यात सर्वाधिक पाऊस

मुंबईसह किनारपट्टीवर शुक्रवारी पावसाने हजेरी लावली. सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाचपर्यंतच्या नऊ तासांत कुलाब्यात ३८ मिमी, सांताक्रुझमध्ये ३०, अमरावतीत २८, नागपूर, रत्नागिरीत १७, महाबळेश्वर १४, अलिबागमध्ये १४, चंद्रपुरात ८, वर्ध्यात ७, डहाणूत २, नाशिक, नांदेड २ आणि सोलापुरात ३ मिमी पाऊस झाला.