पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या (२३ ऑगस्ट) दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे.

राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्य मंडळातर्फे दहावीची पुरवणी परीक्षा १६ जुलै ते ३० ऑगस्ट या कालावधीत, तर बारावीची पुरवणी परीक्षा १६ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत घेण्यात आली. गुणपडताळणी, छायाप्रतीसाठी २४ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत अर्ज करता येणार आहे. पुनर्मूल्यांकनासाठी आधी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे आवश्यक आहे.  https://maharesult.nic.in/ आणि mahasscboard.in या संकेतस्थळांद्वारे निकाल पाहता येणार आहे.  

Scholarship Exam Schedule Announced, deadline application,
पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; परीक्षा कधी, अर्ज भरण्यासाठीची मुदत किती?
22nd October Rashi Bhavishya In Marathi
२२ ऑक्टोबर पंचांग: जन्मराशीनुसार आज कर्तुत्वाला मिळेल चांगला…
Important Clarification of State Board regarding 10th and 12th Exam Time Table
दहावी, बारावी परीक्षा वेळापत्रकाबाबत राज्य मंडळाचे महत्त्वाचे स्पष्टीकरण… नेमके झाले काय?
MPSC declared the result of Assistant Room Officer post
एमपीएससीकडून सहायक कक्ष अधिकारी पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; अवधूर दरेकर राज्यात प्रथम
Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University Winter 2024 exam dates announced Nagpur news
नागपूर: विद्यार्थ्यांनो; विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या सविस्तर…
applications 10th exam, Maharashtra State Board,
दहावीच्या परीक्षेचे अर्ज कधीपासून भरता येणार? राज्य मंडळाने दिली माहिती
MPSC Agricultural Services, MPSC, court order,
‘एमपीएससी’ कृषी सेवा: न्यायालयाच्या आदेशानंतरही नियुक्ती देण्यास अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ?
Mahajyoti, MPSC, MPSC examination,
‘एमपीएससी’ परीक्षेत ‘या’ संस्थेच्या १५१ विद्यार्थ्यांनी मारली बाजी, उपजिल्हाधिकारी पदी विनीत शिर्के

हेही वाचा >>>कल्याणीनगर अपघात प्रकरण: रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी अगरवाल दाम्पत्य, डॉक्टरांसह इतरांचा जामीन अर्ज फेटाळला

यंदा दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी २८ हजार ९७६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यात २० हजार ३७० मुले, ६ हजार ६०५ मुली, एक तृतीयपंथी विद्यार्थ्याचा समावेश होता. तर बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी ५६ हजार ८४५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यात ३६ हजार ५९० मुले, २० हजार २५० मुली, पाच तृतीयपंथी विद्यार्थ्यांचा समावेश होता.