पुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी रास्त आणि किफायतशीर दराची (एफआरपी) ९६.५३ टक्के रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे. उर्वरित ११९९ कोटी रुपयांची रक्कम १११ कारखान्यांकडून शेतकऱ्यांना देणे बाकी आहे.

यंदा राज्यात २१० साखर कारखान्यांनी १०५३.६६ लाख टन उसाचे गाळप केले आहे. त्यापोटी शेतकऱ्यांना एकूण ३४ हजार ५४२ कोटी रुपयांची एफआरपी देणे होते. त्यांपैकी ३३ हजार ३४३ कोटी रुपयांची एफआरपी कारखान्यांनी शेतकऱ्यांना दिली आहे. मात्र, अद्यापही ३.४७ टक्के म्हणजे ११९९ कोटी रुपयांची रक्कम १११ कारखान्यांकडून शेतकऱ्यांना देणे बाकी आहे. राज्यातील २१० पैकी ९९ साखर कारखान्यांनी एफआरपीची पूर्ण रक्कम दिली आहे. ९० टक्क्यांहून जास्त एफआरपी देणाऱ्या कारखान्यांची संख्या ८६ आहे. साठ टक्क्यांहून अधिक एफआरपी देणारे १६, तर साठ टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी देणारे नऊ कारखाने आहेत. या नऊ कारखान्यांना साखर आयुक्तालयाने आरआरसीची नोटीस बजावली आहे.

पिंपरी: कुदळवाडीतील पत्राशेड, कारखाने, गोदामे, भंगार दुकानांवर सलग दुसऱ्यादिवशी कारवाई; ६०७ बांधकामे भुईसपाट
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
no action taken against project officer shubham gupta guilty in cow allocation scam
गायवाटप घोटाळ्यात दोषी आयएएस अधिकारी गुप्ता यांच्यावर कारवाई केव्हा? प्रशासनाकडून होणाऱ्या दिरंगाईवर…
Sugar Commissionerate is committed to go above and beyond to ensure human rights of sugarcane workers
ऊसतोड कामगारांना मानवी हक्क मिळवून देण्यासाठी कटिबद्ध, साखर आयुक्त कुणाल खेमनर यांची ग्वाही
fountain , Chandrapur , mosquitoes,
चंद्रपुरातील कारंजी बनली डास उत्पत्ती केंद्र
akola reports 5 suspected cases of guillain barre syndrome
सावधान! ‘जीबीएस’ची अकोल्यात धडक, पाच रुग्ण आढळले; एक रुग्ण व्हेंटिलेटरवर
india sugar production declines by 2 million tonnes
देशांतर्गत साखर उत्पादनात २० लाख टनांची घट; घट ४० लाख टनांवर जाण्याची भीती
How much sugar has been produced in Maharashtra and how much will be produced Mumbai print news
राज्याने साखर उत्पादनाचा महत्त्वाचा टप्पा गाठला; जाणून घ्या, साखर उत्पादन किती झाले, किती होणार 

इथेनॉल निर्मिती फायदेशीर

इथेनॉल निर्मितीत देशात महाराष्ट्र आघाडीवर आहे. राज्यातील साखर कारखान्यांची इथेनॉल निर्मिती करण्याची वार्षिक क्षमता २२६ वरून २४४ कोटी लिटपर्यंत वाढली आहे. तेल उत्पादक कंपन्या या इथेनॉलचा पुरवठा झाल्यानंतर २१ दिवसांत साखर कारखान्यांना पैसे देतात. त्यामुळे कारखान्यांकडे खेळते भांडवल उपलब्ध होते. त्यातून एफआरपीही देण्यात येते. अनेक कारखान्यांनी ऊस गाळप झाल्यावर दहा दिवसांत एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना दिली असल्याचे साखर आयुक्तालयाकडून सांगण्यात आले.

Story img Loader