लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : मुद्रांक शुल्क न भरलेल्या किंवा कमी मुद्रांक शुल्क भरलेल्या प्रकरणात नागरिकांना दिलासा देण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने सुरू केलेल्या अभय योजनेचा पहिला टप्पा २९ जानेवारीला संपला. योजनेच्या पहिल्या टप्प्यात तब्बल १६६ कोटी आठ लाख ४० हजार ६०७ रुपयांचे मुद्रांक शुल्क आणि दंड राज्य शासनाने माफ केला आहे. या योजनेचा सर्वाधिक लाभ मुंबईत घेण्यात आला असून १०७ कोटी ७३ लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क आणि दंड हा माफ करण्यात आला आहे.

houses sold mumbai, houses sold August mumbai,
मुंबई : ऑगस्टमध्ये ११ हजारांहून अधिक घरांची विक्री, मुद्रांक शुल्क दरात कपात होण्याच्या निर्णयाकडे लक्ष
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
low price to mung, soybean, mung price,
सोयाबीननंतर मूगही कवडीमोल, राज्यातील बाजार समित्यांमध्ये किती दर ?
Nagpur, cybercrime, fraud, illegal transaction, ICICI Bank, SBI account, WhatsApp call, cybercriminals, phishing
राज्यात तोतया सायबर पोलिसांचा सुळसुळाट, तब्बल २० कोटी…
Deputy Chief Minister Ajit Pawar information about Ladki Bahin Yojana print politics news
‘लाडकी बहीण’ योजनेतून दर वर्षी ४६ हजार कोटींची मदत; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
Ladaki Bahin Yojana 3 thousand deposited in account and get only 5 hundred to 1 thousand rupees
लाडकी बहीण योजना : खात्यावर जमा केले ३ हजार अन् मिळताहेत केवळ पाचशे ते १ हजार रुपये! बँकांकडून कात्री…
The fiscal deficit of the maharashtra state is over two lakh crores
राज्याची वित्तीय तूट दोन लाख कोटींवर! राजकोषीय तूट पाच टक्क्यांवर; वित्त विभागाकडून सरकारला इशारा
Industry Minister Uday Samant informed that investment of one lakh crores will soon be made in the state
राज्यात लवकरच एक लाख कोटींची गुंतवणूक

राज्यात नागरिकांनी कमी भरलेले मुद्रांक शुल्क भरण्यासाठी दंडाची तरतूद आहे. कमी भरलेल्या मुद्रांक शुल्कापेक्षा दंडाची रक्कम जास्त झाल्याने संबंधित नागरिक दंड आणि कमी भरलेले मुद्रांक शुल्क भरण्यास टाळाटाळ करीत होते. मुद्रांक शुल्क वसुलीबाबत अनेक अडचणी येत होत्या. त्यामध्ये नोटीस आल्यानंतर अनेकांनी आपल्या मालमत्ता विकून व्यवहार पूर्ण केले. पत्ते बदलले होते. काही जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे चुकीचे मुद्रांक शुल्क आणि दंड वसूल करणे प्रत्यक्षात शक्य होत नव्हते. त्यामुळे अभय योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आणखी वाचा-समूह शाळांसाठी राज्यभरातून ७०० प्रस्ताव; किती शाळांचे समायोजन शक्य?

योजनेचा आढावा –

मुद्रांक शुल्क आणि दंड १०० टक्के माफ असलेले प्राप्त अर्ज – १८ हजार ६५२
माफी दिलेल्या मुद्रांक शुल्काची रक्कम – ५१ कोटी ३० लाख चार हजार २०७
माफी दिलेली दंडाची रक्कम – ११४ कोटी ७८ लाख ३६ हजार ४००
एकूण माफी दिलेली रक्कम – १६६ कोटी आठ लाख ४० हजार ६०७