पुणे : राज्यात अनेक भागांत डोळे येण्याची साथ मोठ्या प्रमाणात सुरू आहे. राज्यभरात ११ ऑगस्टपर्यंत रुग्णसंख्या सुमारे चार लाखांवर पोहोचली आहे. सर्वाधिक रुग्णंसख्या बुलढाण्यात असून, त्यानंतर पुणे, जळगाव, नांदेड आणि चंद्रपूरमध्ये प्रमाण जास्त आहे. विशेष म्हणजे, मागील आठ दिवसांत रुग्णसंख्येत तब्बल दोन लाखांहून अधिक वाढ नोंदविण्यात आली आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यातील डोळे येण्याच्या साथीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णसंख्येत मोठी वाढ सुरू झाली. ही वाढ दिवसेंदिवस आणखी वाढताना दिसत आहे. राज्यात ३ ऑगस्टला रुग्णसंख्या १ लाख ८७ हजार होती. ती ११ ऑगस्टपर्यंत वाढून ३ लाख ९९ हजार ६०५ वर पोहोचली आहे. म्हणजेच आठ दिवसांत रुग्णसंख्या दोन लाखांहून अधिक वाढली आहे.

imd predict after above average rainfall severe cold weather in maharashtra
जास्त पावसानंतर यंदा राज्यात थंडीचाही कडाका
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
rain Maharashtra, monsoon Maharashtra,
यंदाच्या पावसाळ्यात राज्यात किती पाऊस पडला ? जाणून घ्या, सर्वात कमी, सर्वात जास्त पाऊस कुठे झाला
cath lab will be started in 23 districts in the state
राज्यात २३ जिल्ह्यांमध्ये सुरू होणार कॅथलॅब
Due to ongoing heavy rains in state there is huge loss of crops in Kharif season
राज्यात दोन दिवसांत पिकांची दाणादाण जाणून घ्या, कोणत्या जिल्ह्यात, किती नुकसान
Chhatrapati Sambhajinagar, Amravati,
अमरावती, छत्रपती संभाजीनगरच्या ज्वारी खरेदी उद्दिष्टाला कात्री; अकोल्यासह पाच जिल्ह्यांच्या…
Chandrapur Sudhir mungantiwar marathi news
नागपूर : वन्यप्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांवर वनमंत्री म्हणतात, “उपाययोजना…”
Heavy rain Maharashtra, agricultural Maharashtra,
आठवडाभर राज्यात सर्वदूर दमदार सरी? ऐन सुगीत शेतीमाल मातीमोल होणार?

हेही वाचा >>> मेट्रोचा प्रवास सहजसोपा! ‘एक पुणे कार्ड’चा पुण्यासह देशभरात कुठेही वापर शक्य

राज्यात ११ ऑगस्टपर्यंत डोळे येण्याचे सर्वाधिक ४४ हजार ३९८ रुग्ण बुलढाणा जिल्ह्यात आढळले आहेत. त्याखालोखाल पुणे जिल्ह्यामध्ये ३२ हजार ४६२, जळगाव २५ हजार ७०९, नांदेड २२ हजार ८६० आणि चंद्रपूर १७ हजार ८५१ अशी रुग्णसंख्या आहे. पुणे महापालिकेच्या हद्दीत ८ हजार ३५७ रुग्ण आढळले असून, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत ६ हजार ७२१ रुग्ण सापडले आहेत. मुंबईतील रुग्णसंख्या ३ हजार ४९० आहे.

काळजी काय घ्यावी?

राज्यातील अनेक भागांत ‘डोळे येणे’ या आजाराच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. डोळे येणे हा आजार मुख्यत्वे ॲडिनो विषाणूमुळे होतो. हा सौम्य प्रकारचा संसर्ग आहे. साधारणपणे डोळा लाल होणे, वारंवार पाणी गळणे, डोळ्याला सूज येणे अशी लक्षणे आढळतात. डोळे आलेल्या व्यक्तींनी स्वत:चे घरामध्ये विलगीकरण करणे गरजेचे आहे. आजाराचा संसर्ग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला वेगाने होतो. त्यामुळे हा आजार होऊ नये म्हणून वारंवार हात धुणे, वैयक्तिक स्वच्छता ठेवणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घेणे, डोळ्यांना हात न लावून या आजाराला प्रतिबंध करावा, असे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

हेही वाचा >>> स्वातंत्र्यदिनी राज्यातील १८६ कैद्यांची होणार सुटका

आरोग्य विभागाकडून उपाययोजना काय? आरोग्य विभागामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून डोळे येण्याची साथ सुरू असलेल्या भागात आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी सर्वेक्षण करण्यात येत आहे. साथ असलेल्या भागात शाळेतील मुलांची डोळ्याची तपासणी करून उपचार करण्यात येत आहेत. सर्व आरोग्य संस्थांमध्ये आजाराच्या उपचारासाठी लागणारी आवश्यक औषधे उपलब्ध करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर यांनी दिली.