पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील दुसरी गुणवत्ता यादी आज (१० जुलै) जाहीर होणार आहे. पहिल्या फेरीत ३८ हजार ८९० विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर होऊनही जेमतेम निम्म्याच विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. त्यामुळे दुसऱ्या फेरीत किती विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर होतो, याकडे लक्ष लागले आहे.

 यंदा अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत ३४० महाविद्यालयांमध्ये १ लाख १९ हजार ७०५ जागा उपलब्ध आहेत. त्यातील ९३ हजार ३४६ जागा केंद्रीय प्रवेशांसाठी (कॅप), तर २६ हजार ३५९ जागा कोटा प्रवेशांसाठी आहेत. दुसऱ्या फेरीपर्यंत विद्यार्थ्यांची नोंदणीमध्ये वाढ झाली असून ९९ हजार १७० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. आतापर्यंत केंद्रीय प्रवेश (कॅप) आणि राखीव जागा (कोटा) मिळून २५ हजार ३७२ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. तर अद्याप ९४ हजार ३३३ जागा रिक्त आहेत.

transplant artificial limb for injured cow in mumbai
जखमी गायीला कृत्रिम पाय; प्रत्यारोपणाची पहिली आणि यशस्वी शस्त्रक्रिया
Sharad Pawar
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास मंत्रिमंडळात कोण…
Admission to medical courses will be held even on holidays
वैद्यकीय अभ्यासक्रमाचे प्रवेश सुट्टीच्या दिवशीही होणार
BMC Clerk Recruitment 2024: Last Day to Apply for 1,846 Vacancies
BMC Clerk Recruitment 2024: मुंबई मनपाच्या लिपिक पदासाठीची ‘ही’ जाचक अट रद्द; पुन्हा भरती प्रक्रिया सुरू होणार
Disposal of two and a half lakh metric tons of waste by Vasai Municipal corporation
कचरा विल्हेवाट प्रक्रियेला वेग; पालिकेकडून सव्वा दोन लाख मॅट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट
right to education
अर्ज करूनही ‘आरटीई’मध्ये अद्यापही प्रवेश मिळाला नसेल तर हे करा, शेवटची संधी
admission class 11, class 11,
अकरावीची प्रवेश प्रक्रिया यंदाही रखडली, आता दैनंदिन गुणवत्ता फेऱ्या
tender process, Abhyudaya Nagar redevelopment,
मुंबई : अभ्युदयनगर पुनर्विकासाची निविदा प्रक्रिया तूर्तास लांबणीवर, नियमानुसार ७५० चौ. फुटाचे घर देण्याची रहिवाशांची मागणी

हेही वाचा >>>पुणे: पावसानेच घेतली सुट्टी!

या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी आज (१० जुलै) जाहीर करण्यात येणार आहे. या फेरीत प्रवेश जाहीर होणाऱ्या विद्यार्थ्यांना १२ जुलैपर्यंत प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे अनिवार्य आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेतल्यास त्यांना पुढील फेरीत सहभागी होता येणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे.