लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात करोना संसर्ग होऊन मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून ५० हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येत होती. ही योजना १ मार्चपासून बंद करण्यात आली आहे. मात्र, अनुदानापासून वंचित राहिलेल्या ७५० पैकी ५०० जणांच्या वारसांना लाभ देण्यात आला आहे. कागदपत्रे अपूर्ण असल्याने अद्यापही २५० लाभार्थी हे प्रतीक्षेत आहेत.

senior citizen dies in st bus accident
एसटी बसच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Chief Minister s Relief Fund marathi news
आता प्रत्येक जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष’
jalgaon railway accident pushpak express residents of Nepal
जळगाव रेल्वे अपघातातील १२ मृतांची ओळख, सात जण नेपाळचे रहिवासी, मृतदेह रुग्णवाहिकांमधून रवाना
people , Vidarbha , Republic Day celebrations,
गणराज्य दिन संचलनाचे विदर्भातील ५१ जण होणार साक्षीदार
Deputy Chief Minister Eknath Shinde directed to build Ayushman Shatabdi Tower in KEM for patients Mumbai print news
रुग्णांसाठी केईएममध्ये आयुष्मान शताब्दी टॉवर उभारावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
hane rural areas thane district residents homes Central and State government Gharkul scheme
ग्रामीण भागातील १५ हजारहून अधिक रहिवाशांना मिळाले स्वप्नातले घर, केंद्र आणि राज्य पुरस्कृत घरकूल योजना प्रगतीपथावर
pimpri family attempt suicide
पिंपरी : सावकारी जाचाला कंटाळून कुटुंबाचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; आई-मुलाचा मृत्यू, वडील बचावले

शहरासह जिल्ह्यातील ७५० करोना मृतांच्या वारसांनी योजना बंद होण्याआधी अनुदानासाठी अर्ज करूनही त्यांना लाभ देण्यात येत नव्हता. याबाबत ‘लोकसत्ता’ने १५ जुलै रोजी वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करून ५०० जणांना लाभ मिळवून दिला आहे. अद्यापही २५० जणांना लाभ देण्याचे बाकी आहे.

हेही वाचा… पुण्यावर फुली! लायसन्स स्मार्ट कार्ड छपाई फक्त मुंबई, नागपूर, औरंगाबादमध्येच

राज्यात करोनाचा रुग्ण सापडल्यापासून आतापर्यंत पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील २० हजार ६३७ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. करोनामुळे मृत्यू झाल्यास संबंधितांच्या नातेवाइकांना ५० हजार रुपयांचे अनुदान देण्याची योजना महाविकास आघाडी सरकारने सुरू केली होती. ती १ मार्चपासून राज्य सरकारने बंद केली. मात्र, १ मार्चपूर्वी करोनामुळे मृत्यू झालेल्या शहरासह जिल्ह्यातील ७५० जणांचे अर्ज प्रलंबित होते.

उर्वरित अर्जांसाठी पाठपुरावा सुरू

जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागातील कक्ष अधिकाऱ्यांनी राज्य शासनाकडून आरोग्य विभाग आणि मंत्रालयातील अधिकाऱ्यांना संबंधित अर्जांबाबत माहिती देत पुन्हा कागदपत्रे पाठविली आहेत. तसेच अर्जदारांनी अर्ज भरताना सादर केलेले बॅँक खाते क्रमांक असलेल्या बँकांतही संपर्क साधून ग्राहकांची ओळख पडताळणी प्रक्रिया (केवायसी), आधार आणि इतर पडताळणी सुरू केली आहे. दुबार अर्ज आले असल्यास त्यातील एकच अर्ज ग्राह्य धरला जाणार असल्याचे नातेवाइकांना देखील कळविण्यात आले असून, पहिल्या टप्प्यात ५०० अर्ज मंजूर झाले आहेत. उर्वरित २५० अर्जांबाबतही पाठपुरावा करण्यात येत असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे यांनी सांगितले.

Story img Loader