पुणे : राज्यातील धरणांमध्ये रविवारअखेर (११ ऑगस्ट) ९६५.३२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. राज्यातील प्रमुख मोठ्या, मध्यम आणि लहान धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता १४३०.६३ टीएमसी इतकी असून, धरणांत ६७.५० टक्के पाणीसाठा झाला आहे.

जलसंपदा विभागाचे निवृत्त अभियंता हरिश्चंद्र चकोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील प्रमुख धरणांची (साठवण क्षमतेनुसार) एकूण पाणी साठवण क्षमता सुमारे १४३०.६३ टीएमसी इतकी आहे. त्यापैकी ९६५.३२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. हा पाणीसाठी सरासरी ६७.५० टक्के इतका आहे.

Onion export decision delayed for three days due to technical reasons
कांदा निर्यातीचा निर्णय तांत्रिक कारणांमुळे तीन दिवसांपासून अधांतरी
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
gst council decides to form new gom for health insurance premium
विमा हप्त्यांवरील जीएसटी कपात लांबणीवर; बैठकीत व्यापक सहमती, नोव्हेंबरमध्ये निर्णय अपेक्षित अर्थमंत्री
dam overflow due to heavy rain
अबब! सात धरणं तुडुंब तर उर्वरित १०० टक्क्यांकडे…विक्रमी जलसाठा
What is the solution to the Ghodbunder road traffic
घोडबंदर रस्त्याच्या कोंडीवर उपाय काय? नवे ठाणे कोंडीचे का ठरू लागलेय? 
yavatmal water pipe line scam marathi news
यवतमाळ जिल्ह्यातील जलवाहिनी घोटाळाः उच्च न्यायालयाकडून चौकशीचे संकेत…
maharashtra weather updates marathi news
राज्यात पावसाची अल्प विश्रांती ? जाणून घ्या हवामान विषयक स्थिती काय ?
Satara, Water storage, Koyna, Dhome,
सातारा : कोयना, धोम, उरमोडी, तारळी धरण ९६ टक्क्यांवर; प्रमुख प्रकल्पातील पाणीसाठा १४५ टीएमसीवर

हेही वाचा – पुण्यात मनोज जरांगे पाटील यांच्या जनजागृती आणि शांतता रॅलीला सुरुवात

पुणे विभागातील धरणांची पाणी साठवण क्षमता ५३७.२८ टीएमसी असून, धरणांत ८३ टक्के म्हणजे, ४४६.०४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पाणीसाठ्याबाबत पुणे विभाग राज्यात आघाडीवर आहे. कोकण विभागाची एकूण पाणी साठवण १३०.८४ टीएमसी असून, पाणीसाठा सुमारे ८९.२६ टक्के, म्हणजे ११६.७७ टीएमसी इतका झाला आहे. नाशिक विभागाची एकूण पाणी साठवण क्षमता २०९.६१ टीएमसी असून, पाणीसाठा ६१.४२ टक्के, म्हणजे १२८.७५ टीएमसी इतका झाला आहे. मराठवाडा विभागाची एकूण पाणी साठवण क्षमता २५६.४५ टीएमसी असून, धरणांतील पाणीसाठा जेमतेम २६.४५ टक्क्यांवर गेला आहे. धरणांतील पाणीसाठा ६७.८१ टीएमसी झाला आहे. अमरावती विभागातील धरणांची पाणीसाठवण क्षमता १३६.७५ टीएमसी आहे. धरणांत सुमारे ६३.८४ टक्के म्हणजे ८३.९१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. नागपूर विभागातील धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता १६२.७० टीएमसी आहे. धरणांत ७५.०२ टक्के, म्हणजे १२२.०३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

हेही वाचा – मागणी वाढल्याने भेंडी, गवार, फ्लॉवर, वांगी, मटारच्या दरात वाढ

विभागनिहाय पाणीसाठा

(टीएमसी आणि कंसात टक्केवारी)

कोकण – ११६.७७ (८९.२६)
नाशिक – १२८.७५ (६१.४२)
मराठवाडा – ६७.८१ (२६.४५)
पुणे – ४४६.०४ (८३.०६)
अमरावती – ८३.९१ (६२.८४)
नागपूर – १२२.०३ (७५.०२)
एकूण – ९६५.३२ (६७.५०)