पुणे : खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील चारही प्रमुख धरणांतील पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कायम आहे. खडकवासला, पानशेत, वरसगांव आणि टेमघर या चारही धरणांत मिळून एकूण ९७.४१ टक्के म्हणजे २८.३९ अब्ज घनफूट एवढा पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या वर्षी याच तारखेला ९९.८३ टक्के म्हणजे २९.१० अब्ज घनपूट पाणी धरणसाखळी प्रकल्पात होते, अशी माहिती राज्याच्या जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.

खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने शुक्रवारी रात्रीपासून खडकवासला धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. शनिवार सायंकाळी पाच वाजल्यापासून या धरणातून मुठा नदीत २ हजार १४० क्युसेक वेगाने सोडण्यात येत असलेले पाणी रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत कायम ठेवण्यात आले होते. चारही धरणांत २८.३९ अब्ज घनफूट पाणीसाठा जमा झाला आहे.

ulhas river water marathwada marathi news
विश्लेषण: उल्हास नदीचे पाणी मराठवाड्याला? प्रदूषण आणि स्थानिक टंचाईचे काय? प्रकल्पास विरोध का?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Crowds flocked to center area of pune on Friday night to watch the spectacle
पुणे : मध्यभागातील रस्ते गर्दीने फुलले! सलग सुट्यांमुळे सहकुटंब देखावे पाहण्याचा आनंद
Sakkardara lake, Nagpur, unsafe,
नागपूरच्या प्रसिद्ध सक्करदरा तलाव परिसर सर्वसामान्यांसाठी असुरक्षित, काय आहेत कारणे?
Badlapur citys only flyover again had large number of potholes
गणरायाचे आगमन खड्ड्यांतूनच, बदलापुरचा उड्डाणपुल पुन्हा खड्ड्यात; जोड रस्ते, चौकही कोंडीत
Hatnur, Aner, Jalgaon, Dhule, water release Hatnur,
अनेर, हतनूरमधून विसर्गामुळे जळगाव, धुळ्यातील नदीकाठच्या नागरिकांना इशारा
Satara, Water storage, Koyna, Dhome,
सातारा : कोयना, धोम, उरमोडी, तारळी धरण ९६ टक्क्यांवर; प्रमुख प्रकल्पातील पाणीसाठा १४५ टीएमसीवर
tap water Water cut off in some parts of Thane on Wednesday x
ठाण्याच्या काही भागात बुधवारी पाणी नाही; पाणी नियोजनामुळे २४ ऐवजी १२ तासांचे पाणी बंद

हेही वाचा – पुणे रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशाला लुटणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी पाठलाग करून पकडले

हेही वाचा – पुणे : पीएमपीची आता कॅशलेस तिकीट सुविधा; सुट्ट्या पैशांवरून होणारी वादावादी थांबणार

सध्या या चारही धरणांत मिळून एकूण २८.३९ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा जमा झाला आहे. वरसगाव, पानशेत आणि खडकवासला ही तिन्ही धरणे १०० टक्के भरली आहेत, तर टेमघर धरण ७९.६२ टक्के भरले आहे. वरसगाव धरणातून ४५० क्युसेकने, तर खडकवासला धरणातून २ हजार १४० क्युसेकने नदीत पाणी सोडण्यात येत आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत खडकवासला धरण परिसरात १ मिलीमीटर, पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ३ मिलीमीटर तर वरसगांव आणि टेमघर धरणाच्या क्षेत्रात प्रत्येकी २ मिलीमीटर पावसाची नोंद जलसंपदा विभागाकडून करण्यात आली.