पुणे : डाव्या विचारसरणी ही दंभ, दर्प आणि अहंकारावर आधारीत आहे. विचार प्रसारासाठी त्यांच्याकडे परिसंस्था आहे. चुकीची मांडणी या विचारधारेकडून होत असल्याने त्याला रोखण्यासाठी सजग राजकीय भूमिका घ्यावी लागणार आहे, असे स्पष्ट मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डाॅ. मोहन भागवत यांनी येथे रविवारी व्यक्त केले. डाव्या विचारसरणीला रोखण्याची क्षमता भारत देशात आहे. हा देश सत्याचा असून धर्मावर चालणारा आहे. त्यामुळे डाव्या विचारधारेची उत्तरक्रिया भारतच करेल, असेही भागवत यांनी सांगितले.

दिलपराज प्रकाशनाच्या वतीने अभिजित जोग लिखित ‘जगभराला पोखरणारी डावी वाळवी’ या पुस्तकाचे प्रकाशन डाॅ. मोहन भागवत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरू डाॅ. शांतीश्री पंडीत, प्रकाशक राजीव बर्वे, अभिजीत जोग यावेळी उपस्थित होते. डाव्या विचारांचे चेहरे वेगळे आहेत, मात्र आसुरी प्रवृत्ती कायम आहे. त्यामुळे प्रतिकार, प्रबोधन, संशोधन आणि योग्य आचारण या मार्गाने ही विखारी, विषारी प्रवृत्ती रोखता येईल, असे भागवत यांनी सांगितले.

loksatta article mahatma Gandhi assassination opposition is left to criticize rss
महात्मा गांधी केवळ संघविरोधासाठीच उरले आहेत?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
influence of right wing ideology in the United States the European Union and some countries in Asia print exp
अमेरिका, इटली, हंगेरी, जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रिया… प्रगत देशांतही उजव्या विचारांचा प्रभाव… मतैक्य कशावर? मतभेद कशाविषयी?
maharashtra navnirman sena demand to use marathi language in bank of maharashtra
महाबँकेत मराठी भाषेचा वापर करा, का केली मनसेने ही मागणी ?
Bharatshet Gogawale On Sunil Tatkare
Bharatshet Gogawale : “एक दिवस तुमच्या सुसंस्कृतपणाचा पाढा…”, भरत गोगावलेंचा सुनील तटकरेंना थेट इशारा
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil : “वाळूच्या गाड्या चालू द्या, काही फरक पडत नाही, सगळे आपलेच लोक”, राधाकृष्ण विखे पाटलांचं धक्कादायक विधान
supriya sule latest news
“असंविधानिक पदनिर्मितीत महाराष्ट्र सर्वांत पुढे”, खासदार सुप्रिया सुळे यांची टीका
Youth Congress protests in front of Sangh headquarters against Dr Mohan Bhagwat statement on freedom
डॉ. मोहन भागवतांच्या ‘त्या’ वक्तव्याविरोधात युवक काँग्रेसचे संघ मुख्यालयासमोर आंदोलन

ते म्हणाले की, मूळात ही विचारणी पाश्चिमात्य आहे. दंभ, दर्प, अहंकारावर ती आधारीत आहे. मीच बलवान आहे, संशोधक आहे, विचारधन आहे, अशी मांडणी या विचारसरणीकडून केली जाते. चुकीच्या विचारांची मांडणी करून ते पोहोचविण्यासाठी आवश्यक परिसंस्था त्यांच्याकडे आहे. विचारसरणीला झुंडशाही करायची आहे मात्र लोकशाही मानली जाते, असे ते भासवितात. मुक्त विचार स्वातंत्र्याच्या नावाखाली त्यांच्याकडून दडपशाही होते, हे वास्तव आहे. देश, धर्म आणि राष्ट्रानंतर आता ही विचारसरणी कुटुंबव्यवस्था पोखरत आहे.

या चुकीच्या विचारसरणीला तोंड देण्यासाठी त्यांचा बुरखा फाडावा लागणार आहे. ती क्षमता भारत देशात आहे. त्यासाठी प्रतिकार करावा लागणार आहे. भारत देश सत्यावर चालणारा आहे. धर्म मानणारा आहे. धर्माची तत्वे जगात सर्वश्रेष्ठ आहेत. त्यामुळे प्रतिकार, प्रबोधन, संशोधन आणि आचरण यावरच या विचारसरणीला रोखणे शक्य होणार आहे. भारत देशात ही क्षमता असल्याने या विचारसरणीची उत्तरक्रिया भारताकडूनच होईल, असे भागवत यांनी स्पष्ट केले. धर्माचा, संस्कृतीचा अभिमान बाळगला पाहिजे. डाव्या विचारसरणीच्या परिसंस्थेला रोखण्याचे सामर्थ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेत आहे, शांतीश्री पंडीत यांनी सांगितले. अभिजित जोग यांनी पुस्तकाची माहिती दिली. राजीव बर्वे यांनी प्रास्ताविक केले. मधुमिता बर्वे यांनी आभार मानले.

Story img Loader