लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची ओबीसी भटके विमुक्त समाजाची इंदापूर येथे शनिवारी (९ डिसेंबर) भव्य सभा झाली. भुजबळांनी या सभेमधून गावबंदी कायद्याला धरून नसल्याचा पुनरुच्चार केला. तसेच सर्वपक्षाच्या नेत्यांना गावबंदी आहे, तर आमदार रोहित पवार यांच्या युवा यात्रेचे स्वागत कसे होते?, असा सवालही त्यांनी सभेत केला होता. या सभेनंतर आमदार गोपिचंद पडळकर यांच्या दिशेने चप्पल फेकण्यात आली. ही सभा आणि त्यानंतर घडलेल्या घटनांचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी (११ डिसेंबर) इंदापूर बंदची हाक देण्यात आली आहे. इंदापूर येथील तरूण गावबंदीविरोधात एकवटले आहेत.

Tribal Reservation Rights Action Committee warns the state government
धनगरांना आरक्षण दिले तर ८५ मतदार संघात भूमिका घेऊ, आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीचा राज्य सरकारला इशारा
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
cm eknath shinde led mahayuti alliance face reservation issue ahead of assembly elections
मराठा, ओबीसी, धनगर, आदिवासी सर्व समाजांना चुचकारताना मुख्यमंत्र्यांची कसोटी, निवडणुकीच्या तोंडावर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
Chhattisgarh Naxal Attck
Chhattisgarh : पोलिसांचे खबरी समजून नक्षलवाद्यांनी दोन गावकऱ्यांना फासावर लटकवलं, छत्तीसगडमधील संतापजनक घटना
america parents punished for kids crime,
विश्लेषण: अल्पवयीन मुलांच्या गंभीर गुन्ह्यांसाठी पालकांनाच अटक? अमेरिकेतील दोन राज्यांचा अनोखा पायंडा… भारतात काय स्थिती?
Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेचा अर्ज स्वीकारला, पण पैसे कधी येणार? सप्टेंबरमध्ये अर्ज भरल्यावर किती पैसे मिळणार? तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे!
private guards stopped tourists for taking rare bird photo at wetland near palm beach road
पाणथळ जागेवर छायाचित्रणास मज्जाव! नवी मुंबईत विकासकाच्या सुरक्षारक्षकांकडून पर्यावरणप्रेमींची अडवणूक
satara A minor girl commits suicide
अल्पवयीन मुलीची तरुणांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या; साताऱ्यात तणाव, पोलीस अधीक्षकांचे कठोर कारवाईचे आदेश

आणखी वाचा-प्रसूतीनंतर तीनपैकी एका महिलेला दीर्घकालीन आरोग्य समस्या! नवीन संशोधनातील निष्कर्ष

ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता गरीब मराठा नागरिकांना आरक्षण मिळावे, अशी सर्व ओबीसी नेत्यांची भूमिका आहे. मात्र, काही जणांकडून लोकप्रतिनिधींना गावबंदी, जाळपोळ करण्यात येत आहे. हे कायद्याला धरून नाही, त्यामुळे इंदापूरमध्ये सोमवारी बंद पुकारण्यात आला आहे. जोवर नेत्यांना करण्यात आलेली गावबंदी उठविली जात नाही, तोवर ओबीसी आंदोलन थांबणार नाही, असे डॉ. शशिकांत तरंगे, पांडुरंग शिंदे, माउली वाघमोडे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. ओबीसी नेत्यांना जाणीवपुर्वक टार्गेट केले जात आहे. ओबीसी नेत्यांना धमक्या देण्यात येत आहेत, तर सामान्या ओबीसी नागरिकांचे काय?, गावबंदी कोणत्या कायद्यात बसते?, असा सवाल करत या तरुणांनी गावबंदी उठत नाही, तोवर आंदोलन सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.