पुणे : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) देशभरातील तंत्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठीची अंतिम मुदत वाढवली आहे. त्यामुळे आता महाविद्यालये, विद्यापीठांतील रिक्त असलेल्या जागांवर विद्यार्थ्यांना ३० ऑक्टोबरपर्यंत प्रवेश घेता येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> खेळाडू आरक्षणाचा लाभ देण्याच्या तरतुदीमध्ये बदल

एआयसीटीईने प्रवेशाच्या अंतिम मुदतीबाबत बदल करून सुधारित शैक्षणिक वेळापत्रक प्रसिद्ध केले. एआयसीटीईच्या आधीच्या वेळापत्रकानुसार तंत्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठीची अंतिम मुदत १५ सप्टेंबर होती. मात्र उत्तरेकडील पंजाबसह राज्यांमध्ये उद्भवलेली पूर परिस्थिती, मणिपूरमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश घेता आला नव्हता. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार एआयसीटीईने प्रवेशासाठीची अंतिम मुदत वाढवली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या रिक्त असलेल्या जागांवर ३० ऑक्टोबरपर्यंत प्रवेश घेता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच एआयसीटीई मान्यताप्राप्त संस्था आणि विद्यापीठांच्या संलग्नतेसाठीही ३० ऑक्टोबर ही अंतिम मुदत आहे.

हेही वाचा >>> खेळाडू आरक्षणाचा लाभ देण्याच्या तरतुदीमध्ये बदल

एआयसीटीईने प्रवेशाच्या अंतिम मुदतीबाबत बदल करून सुधारित शैक्षणिक वेळापत्रक प्रसिद्ध केले. एआयसीटीईच्या आधीच्या वेळापत्रकानुसार तंत्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठीची अंतिम मुदत १५ सप्टेंबर होती. मात्र उत्तरेकडील पंजाबसह राज्यांमध्ये उद्भवलेली पूर परिस्थिती, मणिपूरमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश घेता आला नव्हता. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार एआयसीटीईने प्रवेशासाठीची अंतिम मुदत वाढवली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या रिक्त असलेल्या जागांवर ३० ऑक्टोबरपर्यंत प्रवेश घेता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच एआयसीटीई मान्यताप्राप्त संस्था आणि विद्यापीठांच्या संलग्नतेसाठीही ३० ऑक्टोबर ही अंतिम मुदत आहे.