पुणे : अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली. तसेच अन्य आठ प्रमुख नेत्यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाली. आज मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यात आला. त्यात अर्थमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे देण्यात आले. तसेच शिवसेनेकडे असलेली काही महत्त्वाची खाती राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली. त्यामुळे शिवसेनेचे महत्त्व कमी झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

या पार्श्वभूमीवर पुण्यात एका कार्यक्रमासाठी आलेले शालेय शिक्षणमंत्री यांनी माध्यमांशी संवाद साधताना मंत्रिमंडळ विस्ताराबाबत स्पष्टीकरण दिले. राजकीय परिस्थिती पाहून सरकारमध्ये निर्णय घेतले जातात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ खाते दिले, तरी त्यांच्या निर्णयांवर अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा असेल, असे अजितदादांनीच अनेकदा स्पष्ट सांगितले आहे. त्यामुळे अर्थ खात्याची शिवसेनेला काळजी नाही. आधीच्या सरकारमध्ये काय नाराजी होती हे अजितदादांनी समजून घेतले आहे. त्यामुळे अर्थमंत्री म्हणून अजितदादा सर्वांना न्याय देतील याची खात्री आहे, असे केसरकर यांनी सांगितले. 

supriya sule criticized eknath shinde
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीच्या पक्षप्रवेशावरून सुप्रिया सुळेंचं एकनाथ शिंदेंवर टीकास्र; म्हणाल्या, “मावळते मुख्यमंत्री अन् त्यांचा पक्ष…”
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
Political confusion due to Sharad Pawar statements about Jayant Patil
शरद पवार यांच्या वक्तव्यांमुळे संभ्रम; मुख्यमंत्रीपदाबाबत इस्लामपूर, कराडमध्ये वेगवेगळी विधाने
Uddhav Thackeray challenge regarding the name of Mahayuti Chief Minister Mumbai news
आधी महायुतीचा ‘चेहरा’ जाहीर करा! मुख्यमंत्रीपदाच्या नावाबाबत उद्धव ठाकरे यांचे आव्हान
The attack on Baba Siddiqui reverberated across the country Mumbai crime news
हत्येनंतर राजकीय वादळ; बाबा सिद्दिकी यांच्यावरील हल्ल्याचे देशभरात पडसाद
Baba Siddiqui murder, Baba Siddiqui NC,
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येने राष्ट्रवादीला धक्का
eknath shinde bjp victory in haryana
Eknath Shinde : “हरियाणाप्रमाणेच आता महाराष्ट्रातील जनताही काँग्रेसच्या…”; भाजपाच्या विजयानंतर नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
bjp unexpected hat trick in haryana assembly election
विश्लेषण : हरियाणात भाजपने अनपेक्षितरित्या विजयाची हॅटट्रिक कशी साधली?

हेही वाचा >>> शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शिक्षक भरतीबाबत दिली मोठी अपडेट… म्हणाले, पन्नास हजार पदांची भरती…

अब्दुल सत्तार यांच्याकडे असलेले कृषि खाते राष्ट्रवादीला दिल्याबाबतच्या प्रश्नावर केसरकर म्हणाले, की अब्दुल सत्तार यांनी कृषीमंत्री म्हणून चांगले काम केले. शेतकऱ्यांना वेळेवर पैसे देण्यात आले. सत्तार यांच्याशी बोलूनच मुख्यमंत्र्यांनी कृषि खाते राष्ट्रवादीला दिले. संजय राठोड यांच्याशी चर्चा करूनच खाते बदल करण्यात आले. त्यामुळे नाराजीचा प्रश्नच येत नाही.

हेही वाचा >>> छगन भुजबळांना धमकी प्रकरणात आरोपीची अटक बेकायदा; जामिनावर मुक्तता

महाविकास आघाडी सरकारमध्ये मी चांदा ते बांदा ही योजना आणली. या योजनेला अर्थखात्याकडून निधी मिळाला नाही. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अर्थमंत्र्यांशी चर्चा केली असती तर योजनेला निधी मिळाला असता. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्वांना वेळ देत आहेत, सर्वांना न्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी चांगले काम केले आहे. त्यामुळे तीन पक्षांचे सरकार उत्तम कारभार करेल, असे केसरकर यांनी सांगितले.