उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात सुरू असलेल्या जिल्हा बँक निवडणुकीतील राजकारणावर निशाणा साधला आहे. काही लोकांनी जिल्हा बँक निवडणुकीत जातीयवाद करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अजित पवार यांनी केलाय. तसेच काही लोकांना पाहुण्यारावळ्याचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला, असंही पवारांनी सांगत निशाणा साधला. यावेळी अजित पवार यांनी आम्ही बँक चांगली चालवण्याचा प्रयत्न केल्याचं सांगत शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराने ५ लाख रुपयांपर्यंतचं कर्ज दिल्याची माहितीही दिली.

अजित पवार म्हणाले, “दोन महिला आणि क, ड वर्ग या निवडणुका आहेत. यात काही लोकांनी जातीयवाद करण्याचा प्रयत्न केला, तर कुणी पाहुण्यारावळ्याचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केलाय. मी एकटाच नाही, तर दिलीप वळसे पाटील, दत्तात्रय भरणे आम्ही सगळेच मिळून बँक चांगली चालवण्याचा प्रयत्न करत आहोत. शून्य टक्के व्याज दराने ५ लाख रुपयांपर्यंतचं कर्ज शेतकऱ्यांना दिलं जात आहे. लोकांना काम चांगलं वाटत असेन तर लोक निवडून देतील.”

Shetkari Sangharsh Kruti Samiti, Dhananjay Munde,
कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात सर्वपक्षीय ‘शेतकरी संघर्ष कृती समिती’ची मोट
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
mahayuti will contest assembly elections under the leadership of cm eknath shinde says ajit pawar
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक; अजित पवार यांची माहिती
Arvind Kejriwal resign today
केजरीवाल यांचा आज राजीनामा? राज्यपालांकडे भेटीसाठी वेळ मागितली
BJP leader Anil Vij On Haryana CM
Anil Vij : हरियाणाच्या मुख्यमंत्रिपदावर भाजपा नेते अनिल विज यांचा दावा; म्हणाले, “निवडणूक जिंकल्‍यास…”
government schemes Eknath shinde marathi news
सर्वसामान्यांच्या योजना कायम राहणार – मुख्यमंत्री
book Diary of Home Minister
सावधान ! अनिल देशमुख यांचे पुस्तक येत आहे, निवडणुकीपूर्वी येणार मोठे राजकीय वादळ
Ladki Bahin Yojana, women candidates, assembly elections, mahayuti, Eknath Shinde, Devendra Fadnavis, Nagpur, political pressure, maha vikas aghadi, Congress, BJP, women empowerment,
लखपती दीदी, लाडकी बहीण खूप झाले, उमेदवारीचे बोला! राजकीय पक्षांवर…

“एक म्हणायचा मला पहिल्यांदा संधी द्या, दुसरा म्हणायचा माझी…”

“आम्हाला बिनविरोध जागा मिळण्यात यश आलं. खरंतर शिरूर आणि मुळशीची अ वर्ग जागेची निवडणूक होती. हवेलीत मैत्रीपूर्ण लढत आहे. तिथू दोन्ही आमच्याच विचाराची लोक आहेत. त्या दोघांनाही मी समजाऊन सांगत होतो पण दोघंही हट्टाला पेटले होते. एक म्हणायचा मला पहिल्यांदा संधी द्या आणि दुसरा म्हणायचा ही माझी शेवटची संधी आहे. असं म्हणून दोघेही निवडणुकीत उभे राहिले. त्यामुळे तिथं बिनविरोधसाठी मला यश आलं नाही,” असं अजित पवार यांनी सांगितलं.

“लोक वेगवेगळ्या प्रलोभणांना बळी पडतात”

“एक आहे सामान्य निवडणुकीत सोपं जातं. कारण सर्वसामान्य लोकांना मताचा हक्क असतो. या निवडणुकीत मर्यादित लोकांना मताचा अधिकार असतो. त्यावेळी काही वेगळ्या प्रकारची प्रलोभणं दाखवली तर कधीकधी काहीजण बळी पडतात,” असंही अजित पवारांनी नमूद केलं.

“दुर्दैवाने आम्हाला बिनविरोध निवडणूक करण्यात यश आलं नाही”

अजित पवार म्हणाले, “काही लोक वेगवेगळ्या प्रकारचा प्रचार करत आहेत. मी माझ्या परीने जेवढं समजाऊन सांगता येईल तेवढं सांगितलं आहे. आम्ही संपूर्ण जागा बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने आम्हाला यश आलं नाही. शेवटी लोकशाहीत काही लोक उभे राहतात तसे काही लोक उभे आहेत. आम्ही आमच्या विचाराची लोकं निवडून आणण्यासाठी आमच्या परीने प्रयत्न करतो आहे.”

हेही वाचा : राज्यात अधिक कठोर निर्बंध लागू होणार का? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट केली राज्य सरकारची भूमिका!

“हवेली आणि पुणे शहराचा, पिंपरी चिंचवडचा विचार सर्वात जास्त मतदानात दुसरा क्रमांक बारामतीचा आहे. बारामतीत अ, ब, क, ड, ई अशा वेगवेगळ्या प्रकारची जवळपास ७०० मतं आहेत. आमच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केलाय, आम्ही प्रयत्न केलाय. गेली ३० वर्षे आम्ही खूप चांगल्या प्रकारे बँक चालवतो. यावेळीही लोकांनी सहकार्य करावं, अशी आमची विनंती आहे,” असंही अजित पवार यांनी सांगितलं.