पुणे : खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे सायंकाळ होईपर्यंत जास्तीत जास्त पाणी धरणांमधून नदीत सोडण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी जलसंपदा विभागाला दिले. दिवसा जास्त पाणी सोडल्यास रात्री धरणांच्या परिसरात पाऊस झाल्यास ते पाणी साठविता येईल. परिणामी नागरिकांना त्रास होणार नाही, असेही पवार यांनी सांगितले.

पुण्यात पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे पालकमंत्री पवार यांनी तातडीने मुंबईहून पुणे गाठले. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षात जाऊन सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे आदी या वेळी उपस्थित होते. या अधिकाऱ्यांनी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील पूरस्थितीची माहिती पालकमंत्री पवार यांना दिली.

Ratan Tata Death News in Marathi
Ratan Tata Funeral Update: रतन टाटा यांच्या अंत्ययात्रा मार्गात कडेकोट बंदोबस्त; वरळी परिसरातील वाहतुकीत बदल
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
mpsc mains exams agricultural sector
MPSC मंत्र: राज्यसेवा मुख्य परीक्षा; शेतीपूरक क्षेत्रे आणि अन्नसुरक्षा
Bhoomipujan of Naina projects tomorrow by Prime Minister
नैना’प्रकल्पांचे उद्या भूमिपूजन, पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजनानंतर शेतकऱ्यांचा रोष वाढण्याची शक्यता
Koradi Power Generation Project, Koradi,
वीज निर्मिती प्रकल्पावरून सरकार व पर्यावरणवाद्यांमध्ये जुंपणार, ‘हे’ आहे कारण
Dead fish gifted to Chief Engineer of Environment Department
पिंपरी : …अन् पर्यावरण विभागाच्या मुख्य अभियंत्याला दिले मृत मासे भेट
Deputy Chief Minister Devendra Fadnavis assurance to the project affected fishermen of the port expansion
‘वाढवण’साठी सर्वांत मोठे पॅकेज; प्रकल्पग्रस्त मच्छीमारांना उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन
238 Crore works by Mahavitran for empowerment of power distribution system in Nagpur
ऊर्जामंत्री फडणवीसांच्या नागपुरात वीज यंत्रणा टाकणार कात!; ३१३ कोटींच्या निधीतून…

हेही वाचा…Pune Rain Update: “…म्हणून पुण्यात पाणीच पाणी झालं”, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती; अडकलेल्या नागरिकांसाठी ‘एअरलिफ्ट’ची तयारी!

पालकमंत्री पवार म्हणाले, पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये जेवढे पाणी येत आहे, त्यापेक्षा जास्त पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. जेणेकरून रात्रीतून जास्त पाऊस झाला, तरी ते पाणी धरणांमध्ये साठविता येईल. उजेड असेपर्यंत जास्तीत जास्त विसर्ग करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अंधार झाल्यानंतर धरणांमधून जास्त पाणी सोडल्यास नागरिकांना त्रास होईल. निरा, खडकवासला, चासकमान सर्व कालवे सुरू करण्याची सूचना केली आहे. सर्व धरणांचे टेंभू, ताकारी, म्हैसाळ, उरमोडी, जनाई शिरसाई पुरंदर या सर्व उपसा सिंचन योजना चालू करण्याचे आदेश दिले आहेत. या योजनांमधून पाणी उपसा होऊन वरच्या भागात जाईल जेथे पाण्याची कमतरता आहे. पुण्यातील नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत केले आहे. काही नागरिक स्वत:हून त्यांच्या नातेवाईकांकडे जात आहेत. मुख्यमंत्री माझ्या आणि अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत.