साहित्यविषयक विचारांचे आदानप्रदान आणि मंथन करण्याचे प्रभावी माध्यम अशी प्रतिष्ठा असलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ही आपली आगळीवेगळी ओळख पुसट करत आहे, हे दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या ९८ व्या साहित्य संमेलनाने अधोरेखित केले. भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर हे संमेलन पार पडले असले, तरी त्यातून साहित्यविषयक विचारमंथन झाले का, हा प्रश्न अनुत्तरितच राहिला. तब्बल सात दशकांनी देशाच्या राजधानीमध्ये आणि तेही भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर हे संमेलन अभिजात होईल, ही साहित्यरसिकांची अपेक्षाही फोल ठरली. पुण्यातील एक संस्था दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यशस्वीपणे आयोजन करू शकते, हा आत्मविश्वास जरूर मिळाला. यापूर्वी झालेल्या संमेलनानंतर दिल्लीमध्ये साहित्य संमेलन आयोजिण्याची प्रक्रिया ७० वर्षांनी पार पडली. आता राजधानीमध्ये तिसरे संमेलन होण्यासाठी पुन्हा इतकी वर्षे प्रतीक्षा करावी लागायला नको, एवढी अपेक्षा बाळगायला हरकत नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा