पुणे : अग्निपथ योजनेवरून देशभरात अनेक ठिकाणी तरुणांचा उद्रेक झालेला पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी या आक्रमक आंदोलनाला हिंसक वळणही लागलं. या पार्श्वभूमीवर ‘उरी द सर्जिकल स्ट्राइक’चे जनक जनरल राजेंद्र निंबोरकर यांनी आंदोलक तरुणांना अग्निपथबद्दल चुकीच्या पद्धतीने माहिती देण्यात आल्याचा आरोप केला आहे. तसेच त्या सर्व तरुणांना समजाऊन सांगण्याची गरज असल्याचं नमूद केलं. राजेंद्र निंबोरकर यांनी पुण्यातील भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली.

राजेंद्र निंबोरकर म्हणाले, “अग्निपथ योजनेवरून देशभरात अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडत आहे. देशसेवेसाठी सैन्यभूमीवर उतरणारा तरुण आता हिंसाचाराच्या घटनेत पाहून मला खूप दुःख वाटत आहे. देशाचे नुकसान करायचे असा विचार कसा करू शकतो असा प्रश्न माझ्या मनात आला आहे.”

Eknath Shinde visiting Nashik faction Shiv Sena
एकनाथ शिंदे यांच्या आभार दौऱ्यावरून शिवसेनेत गटबाजी
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Abhyudayanagar redevelopment plan news in marathi
अभ्युदयनगर पुनर्विकास : विकासकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने निविदेला मुदतवाढ देण्याचे सत्र सुरूच
Shiv Sena Shinde group strategizes for party growth before upcoming Pune Municipal Corporation elections
पुण्यावर शिंदे गटाचा ‘आवाज’ वाढणार
citizens affected by garbage fires in kolhapur
कोल्हापुरात कचरा आगीने त्रस्त नागरिकांकडून संताप; प्रशासक धारेवर, पालकमंत्र्यांचीही भेट
Ambulance Fire mahakumbh
Ambulance Catches Fire in Kumbh : महाकुंभ मेळ्यात तैनात असलेल्या रुग्णवाहिकेलाच आग; VIDEO व्हायरल!
Building catches fire in Thane residents escape safely
ठाण्यात इमारतीला आग, रहिवाशांची सुखरूप सुटका
Sanjay Shirsat On Thackeray Group
Sanjay Shirsat : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार? शिंदे गटाच्या नेत्याचा दावा; म्हणाले, “अर्धे आमदार…”

“अग्निपथ योजनेबाबत एका रात्रीमध्ये निर्णय घेतलेला नाही. तो सैन्य दलाच्या तीनही विभागाशी चर्चा करून घेतला गेला आहे. तो कोणत्याही प्रकाराचा चुकीचा नाही. चार वर्ष सेवा केल्यावर सर्व तरुणांना साडेअकरा लाख रुपये मिळतात. पेन्शनचे पैसे कमी करण्यासाठी हे केल्याचा अपप्रचार सध्या सुरू आहे. यामध्ये कोणत्याही प्रकाराचं तथ्य नाही,” असं राजेंद्र निंबोरकर यांनी सांगितलं.

राजेंद्र निंबोरकर पुढे म्हणाले, “ही योजना राजकीयदृष्ट्या प्रेरित नाही. तसेच केंद्र सरकारने योग्य निर्णय घेतला असून त्याचं मी अभिनंदन करतो. मी याबाबत कोणत्याही राजकीय पार्टीच नाव घेत नाही, पण अनेकांनी आग लागली असताना, त्यामध्ये तेल ओतण्याचे काम केले आहे.”

“आपल्या देशातील अनेक भागात आयपीएस, आयएएस अधिकारी म्हणून रुजू होतात. त्या सर्व अधिकार्‍यांनी किमान तीन वर्ष सैन्य दलात जायला हवं. त्यानंतर तेथील शिस्त समजेल आणि देशाबद्दल प्रेम भावना समजण्यास मदत होईल. यासाठी सक्ती केली पाहिजे,” अशी मागणी यावेळी राजेंद्र निंबोरकर यांनी केली.

Story img Loader