पुणे : शिरूर लोकसभेची निवडणूक पक्षनिष्ठेविरोधात बेडूकउड्या या पद्धतीची आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याविरोधात वीस वर्षे टोकाचा संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन कसे होणार, असा सवाल शिरूरचे खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला.

डाॅ. कोल्हे यांची राजगुरूनगर येथे पत्रकार परिषद झाली. त्यात ते बोलत होते. मतदारसंघातील विकासकामांबाबत समाेरासमोर बसून चर्चेस तयार आहे, असे आव्हानही त्यांनी दिले. शिरूर लोकसभेसाठी शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना डाॅ. कोल्हे म्हणाले, की आढळराव नाईलाजाचे उमेदवार ठरले आहेत. महायुतीकडे माझ्याविरोधात निवडणूक लढविण्यासाठी ताकदीचा उमेदवार नाही. वीस वर्षे आढळरावांविरोधात टोकाचा संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन निवडणुकीच्या निमित्ताने होणार का, हा प्रश्न कायम राहणार आहे. आढळराव यांच्या २० वर्षांच्या कारकिर्दीची तुलना माझ्या पाच वर्षांतील कारकिर्दीशी करणे अयोग्य आहे. राजकारण हा माझा पिंड नाही, हा दावा अजित पवार यांनी संदर्भासह स्पष्ट करावा.

Sharad PAwar
“दिवट्या आमदार…”, पुण्यातील आमदारावर शरद पवारांची टीका; म्हणाले, “राष्ट्रवादीच्या नावाने…”
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
BJP leaders Demand to Give a chance to the old workers while pampering the new ones
नव्यांचे लाड करताना जुन्या कार्यकर्त्यांनाही संधी द्या! भाजप नेत्यांची नेतृत्वाकडे मागणी
supriya sule on balasaheb thorat cm post statement
Supriya Sule : “राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल”, बाळासाहेब थोरातांच्या विधानावर सुप्रिया सुळेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाल्या…
jayant patil appeal bachchu kadu
Jayant Patil : राज्यात तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरु असतानाच जयंत पाटलांचे बच्चू कडूंना आवाहन; म्हणाले…
shiv sena bjp conflict over regularizing construction built by project victims in navi mumbai and panvel
प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर नवी मुंबईत महायुतीतच धुसफुस ?
Vijay Wadettiwar and Sanjay Gaikwad
गायकवाड यांना वडेट्टीवार यांचे प्रत्युत्तर ,म्हणाले ‘पन्नास खोके घेणाऱ्यांना सत्तेची मस्ती’
Aditya Thackeray demands that salaries of municipal workers and employees should be paid within stipulated time
महापालिकेतील कामगार, कर्मचाऱ्यांचे पगार विहित वेळेत द्यावे, शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांची मागणी

हेही वाचा – मावळमध्ये महायुतीत तिढा वाढला; भाजपच्या बाळा भेगडेंनंतर आता ‘यांना’ उमेदवारी देण्याची मागणी

हेही वाचा – ओला, उबरवरील कारवाईला ‘ब्रेक’! आरटीओचे एक पाऊल मागे; कारण काय…

हेही वाचा – सांगलीच्या आखाड्यात पैलवान उतरल्याने भाजप आणि काँग्रेसची समीकरणे बदलली

मोदी सरकार प्रादेशिक पक्षांचे खच्चीकरण करत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक हा त्याचाच भाग आहे. मात्र, आगामी निवडणुकीत भाजपचे सरकार येणार नाही, याची खात्री आहे, असेही त्यांनी सांगितले.