लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : राज्यातील लोकसभेच्या ४८ मतदारसंघांसाठी पाच टप्प्यात मतदान होणार आहे. १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि ५ मे या दिवशी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. नोकरी, व्यवसाय, रोजगारानिमित्त अनेकांनी स्थलांतर केले असले, तरी त्यांचे मतदान मूळगावी, दुसऱ्या मतदारसंघात असते. त्यामुळे अनेक मतदारांना कामावरून सुटी दिली जात नाही. याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे राज्य शासनाने सर्व आस्थापनांना खासगी, शासकीय संस्था, महामंडळे, उद्योग, व्यावसायिक आणि महामंडळाच्या संस्थांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी देण्याचे जाहीर केले आहे.

Mumbai Municipal Corporation will conduct a survey of sanitation workers Mumbai
हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांचे महापालिका सर्वेक्षण करणार; विभागीय कार्यालयाच्या ठिकाणी नोंदणी करण्याचे आवाहन
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
mla sada sarvankar effort to waive 26 rent of st space given to women self help group
आर्थिक संकटातील एसटीची आमदारांकडूनच लूट
RTO Maharashtra, RTO employees, RTO Nagpur,
राज्यभरातील ‘आरटीओ’चे कामकाज ठप्प, संपकर्ते कर्मचारी म्हणतात…
Development of 39 agar station sites of ST on commercial basis Print politics news
‘एसटी’च्या ३९ जागांचा व्यापारी तत्त्वावर विकास; भाडेपट्ट्याच्या कालावधीसह चटईक्षेत्र निर्देशांकात वाढ
Contract recruitment continues through service provider company in government various departments
कंत्राटी भरतीचा पुन्हा धडाका, तीन वर्षे नियमित भरतीची शक्यता धूसर
Refund if higher salary demand guarantee from ST employees
मुंबई : जास्त वेतन आल्यास परत द्या, एसटी कर्मचाऱ्यांकडून हमीची मागणी
2603 contract posts will be filled for 93 health institutions in Maharashtra state Mumbai news
राज्यातील ९३ आरोग्य संस्थांसाठी २६०३ कंत्राटी पदे भरणार

राज्य शासनाच्या उद्योग, उर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागाचे कार्यासन अधिकारी शामकांत सोनावणे यांनी हे आदेश काढले आहेत. अत्यावश्यक सेवा म्हणजेच रुग्णालये, वैद्यकीय संस्था आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांना सुटी देणे शक्य नाही. या ठिकाणी जिल्हाधिकारी यांच्याकडून परवानगी घ्यावी. परवानगी देताना स्थानिक मतदारसंघातच ज्यांचे मतदान आहेत त्या मतदारांना मतदानासाठी दोन तासांची सवलत दिली जाईल, याची खात्री करून कार्यवाही करावी, असेही आदेशात नमूद केले आहे. ज्या मतदारांना आस्थापनांकडून मतदानासाठी कायद्यानुसार देण्यात आलेली सवलत दिली जाणार नाही, त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करण्याचे आवाहन राज्य शासनाकडून करण्यात आले आहे.

आणखी वाचा-तलाठी भरतीतील ५७४ उमेदवारांचे भविष्य टांगणीलाच, जाणून घ्या कारण

महाराष्ट्रात अशी सुटी राहील

पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी- रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर
दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी- बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी- रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदूर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी- नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, मावळ, पूणे, शिरूर, नगर, शिर्डी, बीड
पाचव्या टप्प्यात २० मे रोजी- धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण