पुणे : माजी खासदार राजू शेट्टी यांची राजकीय भूमिका सतत बदलत गेल्याने शेतकरी संघटनेचे नुकसान झाल्याचा आरोप करत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ‘महाराष्ट्र क्रांतीकारी आघाडी’ची घोषणा केली. या आघाडीच्या वतीने विधानसभेच्या २५ जागा लढविणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून सोमवारी (२२ जुलै) तुपकर यांची हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर तुपकर यांनी पुण्यात सहकाऱ्यांची बैठक घेऊन हकालपट्टीच्या निर्णयावर आणि पुढील राजकीय मोर्चेबांधणीवर चर्चा केली.

रविकांत तुपकर म्हणाले, ‘माझी काहीही चूक नसताना शेट्टी यांच्या सांगण्यावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिस्त पालन समितीला ऑगस्ट २०२३ मध्येच मी माझे मत लेखी कळविले होते. त्याचे उत्तर अद्यापही मला मिळालेले नाही. शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्ह्यात राजकारण करताना सतत आपल्या सोयीची भूमिका घेतली. कधी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, तर कधी ‘रिडालो’स सारखा प्रयोग केला. राजकीय स्वार्थासाठी त्यांनी सतत भूमिका बदलल्यामुळेच शेतकरी संघटनेचे नुकसान झाले आहे.’

Ramesh Chennithala criticism of Mahayuti, Igatpuri, loksatta news, Ramesh Chennithala latest news,
ही तर जनतेची दिशाभूल, रमेश चेन्नीथला यांची टीका
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Asim Sarode talk about terms of nirbhay bano for support mahavikas aghadi in assembly election
पाठिंब्यासाठी ‘निर्भय बनो’च्या मविआला अटी, असीम सरोदे यांनी स्पष्टच सांगितले…
Ajit Pawar
Ajit Pawar : अजित पवारांना मोठा धक्का; विधानसभेची उमेदवारी जाहीर केलेल्या आमदारासह ‘या’ नेत्याने हाती घेतली ‘तुतारी’
all schemes including ladki bahin yojana will continue if mahayuti comes in power
‘लाडकी बहीण’सह सर्व योजना सत्ता आल्यास सुरू राहणार; देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची ग्वाही
BJP Centre strongly responded to Pak propaganda Fadnavis on J-K polls
जम्मू काश्मीर विधानसभा निवडणूक लोकशाहीच्या मजबुतीचे लक्षण; देवेंद्र फडणीस यांची प्रतिक्रिया
Maharashtra debt, Maharashtra elections,
महाराष्ट्रात निवडणुका डोळ्यासमोर ठेवून योजना राबविल्या जातात, त्यामुळे राज्यावर ९ लाख कोटींचे कर्ज – जयंत पाटील
Once again Dushkali Forum in Sanglis politics
सांगलीच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘दुष्काळी फोरम’

हेही वाचा >>>नांदेड सिटी परिसरात भरधाव मोटारीची वाहनांना धडक; दुचाकीस्वार महिला जखमी

‘आमचा वाढता जनाधार शेट्टींना नकोसा’

राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना कोल्हापुरातील तीन तालुक्यांपुरतीच होती. ती संघटना आम्ही राज्यभर नेली. शेट्टी यांनी ऊसदर आंदोलनाच्या बाहेर जाऊन काहीच केले नाही. आम्ही विदर्भ, मराठवाड्यात कापूस, सोयाबीन दरासाठी आंदोलने करीत राहिलो, पण, शेट्टी आमच्या मागे समर्थपणे उभे राहिले नाहीत. आम्ही सतत संघर्ष केला म्हणून आम्हाला जनाधार मिळाला. आमचा वाढता जनाधार त्यांना नकोसा वाटत आहे. चळवळीतील कार्यकर्ता मोठा होऊ नये, असेच त्यांना वाटते. त्यांनी अनेकांची संघटनेतून हकालपट्टी केली. दोन दिवसांपूर्वी माझा नंबर लागला. मला संघटना सोडायची नव्हती, मला त्यांनी संघटनेबाहेर काढले आहे, असेही तुपकर म्हणाले.