देशातील पहिल्या मुलींच्या शाळेचे यथोचित स्मारक आणि मजुर अड्ड्यावरील अतिक्रमण हटवून, त्या जागी मजूर भवन उभारण्यात यावे, या मागणीसाठी ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव यांच्याकडून उपोषण करण्यात येत आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या बाजूला असलेल्या मजुर अड्डा येथे लाक्षणिक उपोषणास करण्यात येत आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्त सुरु केलेल्या या लाक्षणिक उपोषणाला विविध संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे.

हेही वाचा- पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये जमीन खरेदीकडे कल, मालमत्ता खरेदी-विक्रीतून पाच हजार कोटींचा महसूल

Request to Urban Development Minister eknath shinde for Uruli-Phursungi TP scheme
उरुळी-फुरसुंगी ‘टीपी’साठी नगरविकास मंत्र्यांना साकडे!
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
NGO , social work, transparency, accountability,
संस्थांची संस्थाने होताना..
NGO , social work, transparency, accountability,
संस्थांची संस्थाने होताना..
cm Devendra fadnavis marathi news
Supriya Sule : राज्य सरकारवर खासदार सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप, म्हणाल्या…!
State government claims in High Court that there is no policy decision yet to start group schools Mumbai news
समूह शाळा सुरू करण्याचा अद्याप धोरणात्मक निर्णयच नाही; राज्य सरकारचा उच्च न्यायालयात दावा, जनहित याचिका निकाली
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
youths Ambernath questions republic day hoardings future corporators
प्रजासत्ताकदिनी तरूणांनी वेधले लक्ष ; प्रजासत्ताक दिनाचे बॅनर का नाहीत, भावी नगरसेवकांना सवाल

यावेळी बाबा आढाव म्हणाले की, देशातील पहिली मुलींची शाळा सुरु करण्याच काम महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केल.या ऐतिहासिक भिडे वाड्याच राष्ट्रीय स्मारक झाला पाहिजे. या कामासाठी निधी देखील पाहिजे.पण इच्छा शक्ती दिसून येत नाही.त्यामुळे या मागणीसाठी 20 डिसेंबर रोजी लाक्षणिक उपोषणास बसलो होतो.

हेही वाचा- दोन महिन्यांतील उन्हाच्या चटक्याचा, अतिवापराचा परिणाम; राज्याच्या जलसाठय़ात १२ टक्के घट

त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भिडे वाडा येथील स्मारकाचा प्रश्न लवकरच मार्गी लावला जाईल,अशी घोषणा हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे केली.त्यानंतर बैठका देखील झाल्या आहेत.पण जोवर कामांना गती मिळत नाही.तोपर्यंत आमचा लढा असाच सुरू राहणार आहे.तसेच आता मजुर अड्डा देखील अनेक वर्षांपासून येथे आहे.त्या ठिकाणी मजुर भवन उभारले गेले पाहिजे.या ठिकाणी अतिक्रमण असून ती महापालिका प्रशासनाने लवकरात लवकर हटविले पाहिजे.या दोन्ही मागण्यासाठी आज लाक्षणिक उपोषणाला बसलो असून राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाने या उपोषणाची दखल घेतली नाही.तर 30 जानेवारी पासून सत्याग्रह मार्गाने असाच लढा सुरू ठेवणार असल्याचा इशारा यावेळी त्यांनी राज्य सरकारला दिला.

Story img Loader